शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद

By admin | Updated: November 3, 2015 00:43 IST

बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे.

कृषी प्लॅनचे एकत्रिकरण : नवीन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
गडचिरोली : बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे राज्यभरातील १२ लाख शेतकरी एकमेकांसोबत मोफत संवाद साधू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना आपसात चर्चा करता यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर मोबाईल बिलाचा अधिक भार पडू नये, या उद्देशाने बीएसएनएलने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात २००९ साली महाकृषी संचार योजना सुरू केली होती. या योजनेचे राज्यात एकूण १३ लाख ग्राहक आहेत. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १०९ रूपयात १ जीबी डाटा, ६ तास बीएसएनएलवरून बीएसएनएल व दीड तास बीएसएनएल ते अदर तसेच ५०० एसएमएस पाठविता येत होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १०८ चा प्लॅन सुरू करण्यात आला. या प्लॅनमध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल ३ तास, इतर नेटवर्क २ तास, ४०० एसएमएस व २०० एमबी डाटा देण्यात येत होता. त्यानंतर २०१५ मध्ये १२८ चा प्लॅन आणला. सदर प्लॅनमध्येही ३ तास बीएसएनएल ते बीएसएनएल व १ तास इतर नेटवर्कवर बोलता येत होते. त्याचबरोबर ३०० एसएमएस व २०० एमबी डाटा दिला जात होता.
या तिन्ही प्लॅनमध्ये पहिला १०९ रूपयांचा प्लॅन सर्वात लाभदायक होता. मात्र बीएसएनएलने १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्लॅनमध्ये कृषी सीमच्या सर्व ग्राहकांना १४१ रूपयांचा इजी रिचार्ज मारावा लागणार आहे. यामध्ये ४५० मिनीटे बीएसएनएल ते बीएसएनएल व ५० मिनीटे इतर नेटवर्कवर बोलता येणार आहे. त्याचबरोबर ४०० एमबी डाटा व ५०० एसएमएस पाठविता येणार आहेत. यानंतर मात्र प्रती मिनीट ५० पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी एका कृषी प्लॅनमधील व्यक्तींना मोफत बोलता येत होते. मात्र दुसऱ्या कृषी प्लॅनमधील व्यक्तीला फोन करण्यासाठी मिनीटे कपात केली जात होती. यानंतर मात्र या तिन्ही कृषी प्लॅनमधील मोबाईलधारकांना १ नोव्हेंबरपासून मोफत बोलता येणार आहे. (प्रतिनिधी)