शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

सोलापुरातील अभयारण्याला माळढोकची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:28 AM

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे.

शीतलकुमार कांबळे

सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे. या अभयारण्यात माळढोक दिसत नसल्यामुळे सोलापूरची ही ओळख विस्मरणात जाण्याची शक्यता आहे.

माळढोक हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश व मध्यप्रदेश या राज्यांतील काही भागांत आढळतो. संबंधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्ये माळढोक अभयारण्याची घोषणा केली. या अभयारण्यात सोलापूर जिल्ह्याचे उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्याचे काही क्षेत्र व अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत, श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील काही क्षेत्राचा समावेश आहे. माळढोक पक्ष्याचा समावेश वन्यजीव कायदा १९७२ च्या शेड्युल- १ मध्ये करण्यात आला आहे.

अभयारण्याचे मुख्यालय सोलापूर जिल्ह्यासाठी नान्नज येथे व अहमदनगर जिल्ह्यासाठी रेहेकुरी येथे आहे. लहान-मोठी शहरे, शेकडो खेडी, रस्ते, रेल्वेमार्गाचे जाळे, शेतीचे हजारो हेक्टर क्षेत्र, लहान औद्योगिक वसाहती, असे क्षेत्र अभयारण्याखाली आल्याने सुरुवातीपासूनच या अभयारण्याला विरोध होत होता. स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या संख्येत असलेले माळढोक ब्रिटिश आणि स्थानिक शिकाऱ्यांचे बळी होत गेले. मोठी वाहने वापरून माळरानावर फिरून या पक्ष्यांची शिकार होऊ लागली आणि माळढोकची संख्या हळूहळू कमी होत गेली. माळढोक वर्षातून एकदा एकच अंडे देतो, तेही उघड्यावरच (जमिनीवरच, झाडांच्या बुंध्यांच्या आसपास, नांगरटीमध्ये). त्यामुळे शिकारी पक्षी, भटकी कुत्री, घोरपड हे प्राणी माळढोकचे अंडे खातात.

म्हणे, अभयारण्य कशाला?

अभयारण्यात माळढोक दिसला नाही तर अभयारण्य कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माळढोक या परिसरात दिसत नसला तरी तो येणारच नाही अशी परिस्थिती नाही, तसेच अभयारण्याला नाव माळढोकचे असले तरी येथे कोल्हा, लांडगा, काळवीट, घोरपड आणि इतर प्राणी व पक्षी आहेत, त्यामुळे अभयारण्य नको असे म्हणणे उचित होणार नाही. येथील जमिनीसाठी काही लोक अपप्रचार करीत असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.

यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे गवतही वाढले आहे. माळढोक पक्षी यावा आणि राहावा यासाठी शासन व पक्षीमित्रांकडून अभयारण्यात काही सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचीही याला चांगली साथ मिळत आहे. अभयारण्यातील काही घडामोडींमुळे तो विचलित झाल्याचे सध्या दिसत नाही. मात्र, त्याला अंडी घालण्यासाठी पोषक वातावरण असल्याने तो पुन्हा येथे येईल.

- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSolapurसोलापूरenvironmentपर्यावरण