Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:56 PM2021-09-24T16:56:36+5:302021-09-24T16:57:19+5:30

Varsha Gaikwad : शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी.

School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies | Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

Next
ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी.

सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं. School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies

ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना माहिती अवगत करून देणं आणि त्यांच्याशी कसं वागावं हे शिक्षकांना सांगाणं. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. याशिवाय घरात शिरताना मुलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, गणवेश धुणे, आंघोळ करणे अशा बाबींचाही नियमावलीत समावेश करण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

बच्चू कडूंकडूनही प्रतिक्रिया
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Read in English

Web Title: School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.