शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते.

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते. विसरण्याची शक्यता असते तिथे आठवण करून देण्याची गरज असते. हा आठवण करुन देण्याचा कालावधी तीनशे पासष्ट दिवसांचा आहे. म्हणजे गोड बोलण्याचा संदेश वर्षभर आपल्या लक्षात राहू शकतो असा त्यामागे पूर्वसुरींचा अंदाज असणार. त्यात काही बदल करण्याची गरज आहे का, हे पाहिले पाहिजे. व्यवहाराला प्राथम्य देणारी नवी मूल्य व्यवस्था उदयाला आली असल्याने गोड या शब्दाला काही नव्या अर्थछटांचा स्पर्श झाला आहे का, हे पाहिले पाहिजे.सामान्यपणे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. गोड या शब्दाची दुसरी बाजू म्हणजे कडू ! गोड आणि कडू हे दोन्ही शब्द परस्परांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येत नाही. म्हणजे गोडात थोडे कडू मिसळणे आलेच. कडू गोष्टी बऱ्याचदा औषधी असतात. औषध तर उघड उघड कडू असते, म्हणून त्याच्या गोळ्या साखरेत घोळून दिल्या जातात. औषध कडू असले तरी माणसाची प्रकृती सुधारावी म्हणून आवश्यक असते. हेच तत्व बोलण्यातही आपल्याला लागू करता आले पाहिजे. अती गोड म्हणजे विष आणि अती कडू म्हणजेसुद्धा विषच. त्यामुळे बोलताना या दोन्हीचे प्रमाण किती ठेवायचे याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.आपण जरी गोड बोलत असलो तरी कधी ते तोंडदेखले, कधी वरवरचे, कधी तिरकस, कधी अतिशयोक्तीपूर्ण, तर कधी कुचेष्टापूर्ण देखील असू शकते. समोरच्या माणसाची आकलनक्षमता लक्षात घेऊनच यातील कोणता शब्दालंकार वापरायचा हे ठरवता आले पाहिजे, नाही तर गैरसमजुतीचा घोटाळा होणार हे नक्की ! एखाद्याच्या स्तुतीचा पतंग आकाशात उडवताना त्याचे जमिनीवरचे पाय तर सुटत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे हीसुद्धा आपली जबाबदारी ठरते.आपल्याविषयी इतरांनी गोड बोललेले आपल्याला आवडते मात्र आपण इतरांच्या बाबतीत तसेच वागतो का, याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. त्याही पलीकडे जाऊन तीळगुळ समारंभ हा केवळ एक उपचाराचा भाग तर झालेला नाही ना, हेही तपासून बघण्याची वेळ आली आहे. तोंडातली तीळगुळाची चव लुप्त व्हायच्या आतच माणसे पुन्हा कडू बोलायला सुरुवात करणार असतील तर रोजच्या रोज तीळगुळ समारंभ करूनही त्याला काही अर्थ राहणार नाही.- प्रल्हाद जाधव