शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबादला डच्चू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार ...

उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे बंजारा समाज बांधवांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्याचे शिष्टमंडळ मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे.

मागासवर्गीय वस्ती विकास याेजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने तांड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजना हाती घेण्यात आली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना ही याेजना संपूर्ण राज्यभरासाठी लागू हाेती. यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. यानंतर त्यांनी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना करून प्रस्ताव राज्यस्तरावर मागविण्यास सुरूवात केली. यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने समितीचे अध्यक्षपद त्या-त्या मतदार संघाच्या आमदारांकडे दिले. दरम्यान, समितीचे अध्यक्षपद पूर्वीप्रमाणे बंजारा समाजातील व्यक्तीकडे असावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत हाेता. या अनुषंगाने मंत्री वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतानाच दुसरीकडे या याेजनेत अवघ्या ११ जिल्ह्यांचाच समावेश केला आहे. त्यामुळे तांड्यांची लक्षणीय संख्या असलेल्या अन्य जिल्ह्यांचे काय, असा प्रश्न आता समाजबांधवांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जे अकरा जिल्हे निवडले आहेत, त्यात बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, साेलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगाेली आणि वाशीमचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांच्या यादीत १३१ तांडे असलेल्या उस्मानाबादचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तांड्यांच्या विकासासाठी निधी आणायचा काेठून? असा प्रश्न आता बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तांड्यांची संख्या लक्षात घेता, शासनाने या याेजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे महेश पाटील यांनी केली आहे.

चाैकट...

शिष्टमंडळ मुंबईला जाणार...

जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, कळंब आदी तालुक्यांत मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. मात्र, तांडा वस्ती याेजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तांड्यांवर विकासाची कामे करताना निधीचा प्रश्न भेडसावू शकताे. सदरील प्रश्न लक्षात घेऊन आम्ही मुंबई येथे जाऊन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहाेत, असे समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

कार्यालयास लेखी आदेश नाही...

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबाद वगळल्याची कल्पना नाही. अथवा तसे लेखी पत्र शासनाकडून आमच्या कार्यालयास आलेले नाही, असे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब अरावत यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.