शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहराला डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी सभेत एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर आयुक्तांनी १५ सप्टेंबरपासून शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याचे जाहीर केले आहे़ सणासुदीच्या काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणी सोडण्यात येणार आहे़ सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - विषम दिनांक १५ , १७, १९, २१ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील भाग, वजिराबाद, गुरूद्वारा परिसर, इतवारा, गाडीपुरा, खुदबईनगर, होळी, चौफाळा, रंगारगल्ली, सिद्धनाथपुरी, गणिमपुरा, सिद्धार्थनगर, खडकपुरा, दुल्लेशाह रहेमाननगर, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ, सोमोश कॉलनी, मीलरोड, गोवर्धनघाट, देगावचाळ, चिखलवाडी, डॉक्टरलेन, गवळीपुरा, शिंधी कॉलनी, बाफनारोड, अबचलनगर, दशमेशनगर, महेबुबीयाकॉलनी, पाकिजानगर, एकबालनगर, मिल्लतनगर, गाडेगावरोड, छत्रपतीनगर जलकुंभावरील भाग, तरोडा खु़ भाग, शोभानगर, पौर्णिमानगर, हनुमानगड, व्हीआयपीरोड, गोकुळनगर, दत्तनगर,नवामोंढा व सिडको भाग़ सम दिनांक१६, १८, २०, २२ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील भाग, गणेशनगर, रामानंदनगर, विजयनगर, यशवंतनगर, राजनगर, कैलासनगर, निजामकॉलनी, अशोकनगर, आनंदनगर, श्यामनगर, हर्षनगर, शाहूनगर - बाबानगर, वसंतनगर, मगणपुरा, शिवाजीनगर, नईआबादी, विसावानगर, रविराजनगर, कल्याणनगर, सन्मित्रकॉलनी, प्रभातनगर, स्नेहनगर आदी़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरले असले तरी पुढील पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे़ यंदा अडीच महिने पावसाने हुलकावणी दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिले होते़ त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती़ मात्र उशिरा झालेल्या पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरले़ त्यामुळे हे पाणी टिकविण्यासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आहे़ शहराला नियोजन करून पाणी सोडणे, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे, फुटलेले पाईपलाईन तात्काळ दुरूस्ती करणे, आदी कामांसाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक नंदकुमार चालिकवार यांनी केली आहे़