शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या विकासात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा -अब्दुल सत्तार

By admin | Updated: October 11, 2014 00:40 IST

औरंगाबाद : राजेंद्र दर्डा नेहमीच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादची बाजू ठामपणे मांडतात.

औरंगाबाद : गेल्या पंधरा वर्षांमध्ये राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. पिण्याचे पाणी ते डीएमआयसीपर्यंत अनेक योजना आणण्यासाठी ते नेहमीच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादची बाजू ठामपणे मांडतात. आज औरंगाबादचा जो विकास झाला आहे त्यामध्ये राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ठाम मत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रेंगटीपुरा येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ रेंगटीपुरा, बायजीपुरा आणि चंपाचौक भागात जाहीर सभांचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, कदीर मौलाना, सुरजित खुंगर यांची समयोचित भाषणे झाली. तीनही सभांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मवाळ आणि अच्छा आदमी अशी प्रतिमा असलेले राजेंद्र दर्डा हे नेहमीच विकासात सर्वांत अग्रेसर राहिले आहेत. महानगरपालिकेत युतीची सत्ता असतानाही लोकांच्या हितासाठी राजेंद्र दर्डा यांनी समांतरसाठी केंद्रातून पैसे उपलब्ध करून दिले. शहरात हज हाऊस, वंदेमातरम् सभागृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी विकासकामांसह सिमेंट रस्ते आणि ड्रेनेजलाईनचे काम करून जनाधार मिळविला आहे.
शिक्षण क्षेत्रात मागच्या २० वर्षांमध्ये झाले नाही एवढे चांगले काम त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केले आहे. विद्यार्थ्यांना एक वर्ष आधी परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यापासून ते शिक्षकांचे पगार बँकेत जमा करण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या विकासकामांपुढे कुणीच टिकू शकणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार राजेंद्र दर्डा असणार आहेत, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
राजेंद्र दर्डा आपल्या भाषणात म्हणाले की, मागच्या पंधरा वर्षांत मी औरंगाबादेत विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आपले प्रत्येक मत बहुमूल्य आहे. त्याचा उपयोग विकासाची गती वाढविण्यासाठी करा, असे आवाहन राजेंद्र दर्डा यांनी केले.
आ. सुभाष झांबड यांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली. एमआयएमचे लोक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला असून ते भाजपाची मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे मतदार बंधूंनी भविष्यातील धोके लक्षात घेऊन काय करायचे आहे, ते ठरवायला पाहिजे. सध्या निवडणुकीतील पाच पक्षांमध्ये फक्त काँग्रेसच धर्मनिरपेक्ष पक्ष असून काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आ. झांबड यांनी केले.
कदीर मौलाना यांनी आपल्या भाषणात राजेंद्र दर्डा यांच्या विकासकामांची अनेक उदाहरणे दिली. हज हाऊस, हजयात्रेसाठी स्वतंत्र विमान, शहरात अनेक भागांमध्ये शादीखाने उभारून राजेंद्र दर्डा यांनी लोकहिताचे काम केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने आतापर्यंत फक्त कब्रस्तानाच्या जमिनी लाटण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनतेने ठरवायचे आहे की, आपल्याला कुणाला निवडून द्यायचे आहे. एमआयएमसारख्या पक्षांपासून या देशाच्या एकसंधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून हैदराबादला हाकलून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन कदीर मौलान यांनी केले.
रेंगटीपुरा येथील सभेला डॉ. जफर खान, तकी हसन, जितसिंग करकोटक, नगरसेवक शेख हबीब कुरेशी, कलीम कुरेशी, दौलतभाई, सलीम कुरेशी, नईम कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. बायजीपुरा येथील सभेत शेख समीर, गणेश सोनवणे, अबू बकर अमोदी, सलीम पटेल, अब्दुल रशीद आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.