शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा तहानला! ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकर्सचे पाणी; ३ लाख नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:14 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर्स सुरू; वाढत्या तापमानामुळे जलसाठे तळाला, मराठवाड्यात पाणीबाणी.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ग्रामीण भागाला वाढत्या तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विभागात कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नाेंदविले जात आहे. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होत आहे. विभागातील ९२ गावे आणि वाड्यांमध्ये १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मे महिना लागल्यामुळे हा आकडा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर या तीन जिल्ह्यांतील गावांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत. यात ३६ वाड्यांचा समावेश आहे. सुमारे तीन लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर सध्या सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरसाठी ३७, टँकर व्यतिरिक्त ४७ मिळून ८४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर जालन्यात ४२ व लातूरमध्ये २४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यासंह २६८ विहिरी ताब्यात आहेत. १५६ खासगी, तर पाच शासकीय टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.

लघु व मध्यम प्रकल्पात कमी साठा...
विभागातील ७५ मध्यम प्रकल्पात सध्या ४२ टक्के, तर ७५८ लघु प्रकल्पात सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ५३ टक्के जलसाठा आहे. विभागात ४८ टक्क्यांपर्यंत जलसाठा सध्या आहे.

जिल्हा.................... गावे/वाड्या ......... टँकर
छत्रपती संभाजीनगर .... ८५ ......... ११५
जालना .................. ३९ ........... ३८
हिंगोली ................. ०१ .......... ०१
लातूर ................. ०२ .............. ०२
एकूण ................. १२७ ............. १५६

यंदा चांगला पाऊस पडेल....
मे अखेरपर्यंत कोरडे व उष्ण हवामान राहील. उष्णता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर मान्सूनचे आगमन होणे शक्य आहे. जून व जुलै महिन्यांत विजांच्या कडकडाटासह व गारांसह पाऊस होईल. यंदा चांगला व समाधानकारक पाऊस होईल.
-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Thirsty: Tankers Supply Water to Villages Amidst Heatwave

Web Summary : Marathwada faces severe water scarcity due to rising temperatures. 156 tankers supply 92 villages and 36 hamlets, impacting 300,000 people. Aurangabad is worst hit, with 115 tankers operating. Good rainfall expected in June and July.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणी