शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

काळीपिवळीला अपघात

By admin | Updated: June 12, 2014 00:06 IST

१३ प्रवासी जखमी : जिंतूर-परभणी महामार्गावरील टाकळी कुंभकर्ण येथे घडली घटना

परभणी : जिंतूर- परभणी महामार्गावरील टाकळी कुंभकर्ण येथे काळीपिवळीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटली़ यामध्ये १३ ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले़ ही घटना ११ जून रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास घडली़ या जखमींना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़
जून महिन्यात महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ १० ते १२ दिवसांत चार ते पाच अपघात झाले आहेत़ यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत़ अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ महामार्गावर अवैध वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे़ त्यामुळेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे़ अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़
जिंतूरहून काळीपिवळी जीप प्रवासी घेऊन परभणीकडे येत होती़ या जीपमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करीत होते़ टाकळी कुंभकर्ण येथे जीप आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला़ त्यामुळे जीप पलटी झाली़
जखमींना तत्काळ परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ जखमींची नावे अशी- दीपक प्रल्हादराव टाळके (वय ४०), रेखा दीपकराव टाळके (वय ३२), गोविंद माधवराव चव्हाण (वय ३२), अनुसयाबाई किशनराव कवडे (वय ६६), चालक धम्मदीप रमेश ननवरे (२५), नामदेव नारायण बुधवंत (४०), विशाल ननवरे (वय २२), बाबुराव भुजंग पंचांगे (४८), शीलाबाई नागनाथ फुलारे (३२), सखुबाई सुभाष मुंडे (३५), शांताबाई नाईक (३०) व बोबडे टाकळी येथील अन्य दोघांचा यात समावेश आहे़
जखमींवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
मालिका सुरूच
आठ दिवसांपासून जिल्ह्यातील राज्य महामार्गावर अवैध वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे़ सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ परंतु, अनेक जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत़ एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाला अवैध वाहतूक बंद करण्यासाठी जाग येते की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे़
जिल्ह्यात अवैध वाहतूक सर्रासपणे केली जात आहे़ या अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात आहेत़ पोलिसांच्या आशीर्वादामुळेच अवैध वाहतूक बोकाळली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमविण्याची वेळ आली आहे़ जिल्ह्यातील अवैध वाहतूक बंद होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे़