शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:03 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झालेल्या १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तरीही अनेक गावांत नळाला पाणीच येत नाही, तर काही गावांना प्रति माणसी ५५ लिटर ऐवजी कधी कधी १०-२० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी योजनांची कामे जि.प. पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. सुरुवातीला मार्च अखेरपर्यंत हे ‘मिशन’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातच मुदतीच्या आत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अखेर शासनाने या ‘मिशन’ अंतर्गत रखडलेल्या कामांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदवाढ दिली. त्यानुसार योजनांच्या कामाने गती घेतली आहे.

सध्या ५७५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची ५५६ कामे पूर्ण झाली असून ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली, तर १५७ गावे प्रमाणित करण्यात आली आहेत. यापैकी १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. असे असले तरी नळजोडणी दिलेल्या अनेक गावांतील नळांना घरापर्यंत पाणीच येत नाही. नियमानुसार प्रतिदिन प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे ‘जलजीवन मिशन’चे उद्दिष्ट आहे. मात्र, अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड या चार तालुक्यांसाठी ‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या वॉटर ग्रीडचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक गावांमध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देणे शक्य झालेले नाही, हे वास्तवही समोर आले आहे.

ग्रामसभेने घ्यावा लागतो ठराव
जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळजोडणी दिल्यानंतर ‘हर घर जल’ प्रमाणित करण्यात येते. त्यानंतर त्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन आपले गाव ‘हर घर जल’ घोषित करावे लागते. त्यानंतर केंद्र सरकारच्या या जल जीवन मिशनच्या पोर्टलवर या गावांची नोंद केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी