शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण शेतकरी अधोगतीला

By admin | Updated: May 3, 2015 01:34 IST

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसाने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्रच कोलमडले आहे.

पोंभुर्णा : दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसाने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्रच कोलमडले आहे. आधारभूत किंमतीपेक्षा उत्पादन खर्च महागला असल्याने संभाव्य आर्थिक संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत परिसरातील शेतकरी सापडला आहे. तर शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम अत्यल्प आहे. झालेले नुकसान लाखो रुपयांत असले तरी मदत मात्र हजारांत मिळत आहे. यामुळे शेतीवरील पीककर्ज व इतर व्यवहार कसे करायचे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली. त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर एक प्रकारे अन्यायच केला जातो. आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारा भाव म्हणजे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकरी खरीप हंगामात जवळपास चार ते पाच महिने कुटुंबासह राबतो. एवढेच नव्हे तर रब्बी हंगामात राबून शेतीतूनन उत्पादन काढतो. विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादीत मालाची विक्री करून आपली व कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काबाडकष्ट सहन करतो. मात्र पाच ते सहा महिने शेती राबून त्याला हव्या तेवढ्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. खऱ्या अर्थाने रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुराएवढी मजुरी मिळत नाही. यामुळे शेती व्यवसाय न परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी सततच्या नापिकीमुळे व संकटामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत गुंतला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्र शासनाकडून शेतमालाचे मूल्यांकन करून आधारभूत किंमती जाहिर करण्यात जातात. जाहिर केलेल्या आधारभूत किंमतीमध्ये शेतमालाची खरेदी विविध संस्थांकडून केली जाते. हमी भावावरच आधारित किंमतीनुसार मालाची विक्री करण्याचा शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागतो. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. शासनाकडून आधारभूत किंमतीतच शेतमालाची विक्री करावी, असे आवाहनही केले जाते. परंतु प्रत्यक्षात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीही शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरत आहे.चंद्रपूर जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुख्यत: जिल्ह्यात धान पीक घेतले जाते. जिल्ह्यात एक एकर शेतीमध्ये धानपिकाचा खर्च २० ते २५ हजार रुपये येतो. तर एक एकर मध्ये जवळपास १० ते १५ क्विंटल उत्पादन होते. (तालुका प्रतिनिधी)