शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बिबी-आवाळपूर रस्त्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 2, 2015 01:13 IST

आवाळपूर ते बिबी पर्यतचा तीन किमीचा रस्ता पूर्णत: उखळला असून या मार्गावरुन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये दररोज ४०० ते ५०० ट्रकांची ये-जा असते.

गडचांदूर : आवाळपूर ते बिबी पर्यतचा तीन किमीचा रस्ता पूर्णत: उखळला असून या मार्गावरुन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये दररोज ४०० ते ५०० ट्रकांची ये-जा असते. धुळीमुळे या परिसरातील लोकांचे जीवन असह्य झाले असून रस्ता खराब असल्याने अनेक अपघात या मार्गावर घडत आहेत. अपघातामुळे प्राणहाणी सुद्धा झालेली आहे. मात्र रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याकरिता २०१३ मध्ये नागरिकांनी आंदोलन सुद्धा केले होते. मात्र तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे अभय मुनोत व हारुण सिद्दीकी यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.नांदाफाटा बाजारपेठेमधील रस्ताही पुर्णत: उखळला असून या रस्त्यावर ट्रकांची २४ तास वर्दळ सुरू असते. धुळीमुळे नागरिकांना व लहान मुलांना विविध आजार होत आहे. नांदाफाटा येथे रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे रस्त्याची दयनिय अवस्था होते. पाण्याचा निचरा होण्याकरिता ड्रेनेज नाही. एका बाजूची ड्रेनेज अल्ट्राटेक कंपनीने नुकतीच बांधून दिलेली आहे. दुसऱ्या बाजूनेही ड्रेनेज बांधून देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.बिबी ते आवाळपूर हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक करण्यास अडचण येत आहे. दररोज हजारो नागरीक ये-जा करतात, मात्र रस्त्याची दुरूस्ती व रूंदी वाढलेली नाही. या मार्गावर रस्ता दुभाजक तयार केल्यास अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. हिच गत हिरापूर ते आवाळपूर रस्त्याचीही आहे. या मार्गावर दुचाकी चालवने अवघड जात असून हिरापूर ते आवाळपूर रस्त्याचेही डांबरीकरण करण्याची गरज मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)