शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देअंकूर करपण्याचा धोका : धान उत्पादक तालुक्यातील रोवणी लांबणीवर जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्रातील दोन-तीन दिवस वगळल्यास जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाच नाही. मात्र, खरीप हंगाम टळेल या धास्तीने हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पेरणी केली. अंकूर उगवले परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. धान उत्पादक ९० टक्के शेतकऱ्यांनी तर अद्याप पºहेच भरले नाही. त्यामुळे यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.मृग नक्षत्र संपून सोमवारी आद्रा नक्षत्र सुरू झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात सुमारे ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांची वर्तविली आहे. आतापर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतातील विहिरी कोरड्या आहेत.अनेक शेतकऱ्यांकडे कृषीपंप असले तरी पाणीच नसल्याने धानाचे पºहे जगवायचे कसे, असा प्रश्न विचारत आहेत. शिवारातील जलस्त्रोतांची पातळी चिंताजनक आहे. शेतीला लागून असलेले नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यावर्षीचा शेतीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरविणारा असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन उगविलेच नाहीराजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही. त्यामुळे मजूर लावून हाताने टोबणी करीत आहेत. बियाणे न उगविल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाºयांकडे केल्या जात आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी वरोरा व भद्रावती येथील शेतकºयांनी केली.दुबार पेरणीचे संकटखडसंगी : परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पेरणी केली. धानाचे पºहे टाकले. बियाण्यांना कोंब आले असताना अचानक पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. खडसंगी परिसरामध्ये कोरडवाहू शेती करणाºयांचीच संख्या अधिक आहे. पावसाने साथ दिली तरच शेती अन्यथा कष्टाची माहिती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.लखमापूर परिसरातील पेरणी रखडलीलखमापूर : कोरपना तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात समाधानकारक ओलावा असेल तरच पेरणी केली जात आहे. यंदा कापूस बियाण्यांची लागवड अधिक प्रमाणात झाली. सोयाबीन लागवड करणारे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर कपाशीचे मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी