शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महसूल कर्मचारी संघटनेचा शासनविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:00 AM

शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱ्यांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संपावर : अनेक मागण्यांवर तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व अप्पर मुख्य सचिव (महसूल ) मनुकुमार श्रीवास्तव यांच्या सोबत बुधवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला. गुरूवारपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने शासकीय कामावर विपरित परिणाम झाला आहे. बल्लारपूर येथील कर्मचाºयांनी कपाटाच्या चाव्या तहसीलदार जयंत पोहनकर यांच्याकडे सुपुर्द करून मागण्याचे निवेदन सादर करून संपात सहभागी झाले.शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाºयांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी २५ आॅगस्टला सामूहिक रजा व ३१ ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करून आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाने लक्ष दिले नाही.अशा आहेत मागण्यामहसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाचे हत्यार पुढे करून प्रलंबित मागण्या सोडविण्याचा आग्रह धरला आहे. नायब तहसीलदारांना राजपत्री दर्जा द्या, नायब तहसीलदार संवर्गातील भरती सरळ सेवा २० टक्के करावी, शिपाई संवर्गातून तलाठी पदाची भरती करावी. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाºयांसाठी ५ टक्के आरक्षण द्यावे, आकृती बंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीच्या अहवालानुसार पदे मंजुर करावी या व अन्य ११ मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून शासन निर्णय निर्गमित करावा, आमच्या प्रलंबित मागण्या न्यायोचित आहेत. यासाठी चार वर्षांपासून लढा सुरू आहे. अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्यासोबत चर्चा फिस्कटल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागला. राज्यभर संपाला प्रतिासद असून २५ हजारांवर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.- हेमंत साळवी, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई

टॅग्स :Strikeसंप