शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

बल्लारपुरात आठ हजार क्विंटल रेशनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२१ हजार ३७० लाभार्थी : पंतप्रधान गरीब कल्याण योजना

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्यात आले. त्यानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यात बल्लारपूर तालुक्यातील ६६ रास्तभाव दुकानदारांनी अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील २१ हजार ३७० लाभार्थ्यांना सुमारे आठ हजार १४४.४ क्विंटल रेशन वाटप करण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे. जून महिन्यात अंत्योदय योजनांच्या सुमारे सात हजार ३०७ लाभार्थ्यांना एक हजार ३६९ क्विंटल तांदूळ व ७३.०५ क्विंटल चण्याची डाळ, प्राध्यान्य कुटुंबातील १४ हजार ६५ कुटुंबांना २ हजार ७६४.०८ क्विंटल तांदुळ व १४०.६५ क्विंटल डाळ वाटप काण्यात आली. याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात धान्य वाटप करण्यात आले. तर मे व जून महिन्यात राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर योजनेतंर्गत बल्लारपूर तालुक्यातील एक हजार ५२२ कुटुंबातील ५ हजार ४०० व्यक्तीस ५४० क्विंटल तांदूळ व ३० क्विंटल चण्याची डाळ वाटप करण्यात आली.ग्राहकांना पावती द्यावीरेशन दुकानातून होणाऱ्या स्वस्त धान्याची विक्री अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील सर्व दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य वाटप करताना त्या शिधापत्रिकेच्या क्रमांक, त्यावरील सदस्यांची संख्या तसेच शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील आदींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. व धान्य घेतलेल्या ग्राहकास दुकानदाराने ई-पास मशीनची पावती देण्याचे निर्देश असताना अनेक रेशन दुकानदार ग्राहकास ही पावती देत नसल्याच्या तक्रार आहेत.खºया लाभार्थ्यापर्यंत अंत्योदय व अन्य योजतंर्गत स्वस्त दरातील धान्य पोहचावे व ग्राहकांना रीतसर ई-पास पावती देण्याचे आमचे निर्देश आहे. याचे उल्लंघन कोणी रेशन दुकानदार करीत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- प्रियंका खाडे, पुरवठा निरीक्षक,तहसील कार्यालय, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिक