शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: November 13, 2015 01:12 IST

यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावली : यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धान उत्पादनावरच वर्षभराचे शेतकऱ्यांचे कुटुंबाच आर्थिक नियोजन होत असते. मात्र धान पीक न झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी मेहाबुजच्या सरपंच उषा राजेंद्र भोयर यांनी प्रशासनाकडे केली आहे.सावली तालुका हा धान पिकाचा पट्टा समजला जातो. तशी ओळखही जिल्ह्यात आहे. या परिसरामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. परिसरात सिंचनाची सोय नसल्याने या पिका व्यतिरिक्त दुसरे पिक घेता येत नाही. खरीप हंगामातच धान पीक घ्यावे लागते. या कालावधीमध्ये पावसाच्या सरी बरसत असतात. त्यामुळे तलाव, बोडी, सारख्या माध्यमातून पाण्यासाची साठणून ठेवून ते पुढे पीक निघेपर्यंत उपयोग करावा लागतो. या कालावधीमध्ये शेती काम मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच अनेक कुटुंबाना शेती नसल्याने त्यांनाही रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ शेतीच्या माध्यमातून मिळत असते.ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात शेती हा जीवन जगण्याचा मुख्य आधार आहे. शेतीच्या माध्यमातून वर्षभराचा रोजगार उपलब्ध होतो. तसेच या पसिरामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. हे वास्तव्य चित्र या भागातील आहे. अशी विचित्र परिस्थिती असताना तलाठ्यांनी धान शेतीचा नजर अंदाज सर्वे करुन ६१ पैसे आणेवारी दाखविली. हे कर्मचारी धान शेतीवर प्रत्यक्ष जात नाही. घरी बसूनच त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात पेरणीपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पीक होत आहे. या परिसरात पाऊस किती झाला याची टक्केवारी कर्मचाऱ्याकडे आहे. (तालुका प्रतिनिधी)