शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: November 13, 2015 01:12 IST

यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावली : यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धान उत्पादनावरच वर्षभराचे शेतकऱ्यांचे कुटुंबाच आर्थिक नियोजन होत असते. मात्र धान पीक न झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी मेहाबुजच्या सरपंच उषा राजेंद्र भोयर यांनी प्रशासनाकडे केली आहे.सावली तालुका हा धान पिकाचा पट्टा समजला जातो. तशी ओळखही जिल्ह्यात आहे. या परिसरामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. परिसरात सिंचनाची सोय नसल्याने या पिका व्यतिरिक्त दुसरे पिक घेता येत नाही. खरीप हंगामातच धान पीक घ्यावे लागते. या कालावधीमध्ये पावसाच्या सरी बरसत असतात. त्यामुळे तलाव, बोडी, सारख्या माध्यमातून पाण्यासाची साठणून ठेवून ते पुढे पीक निघेपर्यंत उपयोग करावा लागतो. या कालावधीमध्ये शेती काम मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच अनेक कुटुंबाना शेती नसल्याने त्यांनाही रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ शेतीच्या माध्यमातून मिळत असते.ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात शेती हा जीवन जगण्याचा मुख्य आधार आहे. शेतीच्या माध्यमातून वर्षभराचा रोजगार उपलब्ध होतो. तसेच या पसिरामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. हे वास्तव्य चित्र या भागातील आहे. अशी विचित्र परिस्थिती असताना तलाठ्यांनी धान शेतीचा नजर अंदाज सर्वे करुन ६१ पैसे आणेवारी दाखविली. हे कर्मचारी धान शेतीवर प्रत्यक्ष जात नाही. घरी बसूनच त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात पेरणीपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पीक होत आहे. या परिसरात पाऊस किती झाला याची टक्केवारी कर्मचाऱ्याकडे आहे. (तालुका प्रतिनिधी)