शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:23 IST

डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.

‘आररर... सरकार मायबाप… पांडुरंगा, आता कठीण झालं! आम्ही कसं जगायचं? आत्महत्या करू का?— अशा हताश आरोळ्यांनी राहेरी परिसरातील शेत थरारून गेले. शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावत कहर माजवला. डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.

शेत जलमय, हिरवी स्वप्नं उद्ध्वस्त

अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. रात्रीच्या पावसाने शेतात मिनी तलावांचे स्वरूप घेतले आहे. एरवी हिरव्यागार पिकांनी डोलणारी शेती आज नुसती पाण्याने भरलेली खाचरे बनली आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

बळीराजाची हतबल हाक

आम्ही शेतकरी आता कस जगायचं? कर्ज, बी-बियाण्याचे पैसे, घरखर्च… सगळं कोलमडलंय. सरकार आमच्यासाठी काय करणार?”— अशी कळकळ समाधान गवई याने व्यक्त केली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून जनतेत संताप उसळला आहे. सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संकटांची मालिका थांबेना

गेल्या काही आठवड्यांपासून सतत होत असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. उत्पादनाचे नुकसान, महागाई, कर्जफेडीची चिंता— या सर्वांनी शेतकरी नैराश्यात ढकलला आहे. राहेरी परिसरात रात्री दोन वाजता झालेल्या पावसाने शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली.

बुलढाण्याचा भीषण हिशेब

--यंदा ९२ पैकी तब्बल ७१ मंडळांत अतिवृष्टी, तर १८ मंडळांत पाच वेळा आणि ४ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टीची नोंद.
--७७ टक्के मंडळे अतिवृष्टीने ग्रासलेली
--२२ सप्टेंबरपर्यंत २ लाख ९६ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान.
--अवकाळी पावसासह ही संख्या ३ लाख ५ हजार हेक्टरपर्यंत.
--जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२.९८% पाऊस आधीच.
--पाच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली

हृदय हेलावणारे वास्तव

राहेरीत शेतात पाण्यात उभा राहून हंबरडा फोडणारा शेतकरी म्हणजे संपूर्ण बुलढाण्यातील बळीराजाची दाहक कहाणी आहे. ‘पिके गेली, स्वप्ने गेली… आता जगायचे कसे?’ हा प्रश्न केवळ राहेरीपुरता नाही; तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers Devastated by Rain, Question Survival After Crop Loss

Web Summary : Heavy rains in Raheri, Maharashtra, have destroyed crops like soybean and cotton, leaving farmers desperate. Facing debt and ruined livelihoods, they question how to survive. A farmer's emotional plea highlights the widespread devastation and calls for urgent government aid, reflecting the plight of Buldhana's farmers.
टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी