शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकरी संघटना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:24 IST

शेतकरी हताश: हेक्टरी आठ हजाराची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच!

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. या धर्तीवर राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी शनिवारी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. यावरून खामगाव व परिसरात शेतकरी संघटना आक्रमक तर शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.
एकीकडे आधीच गत तीन ते चार वर्षांपासून शेतकरी कोरड्या दुष्काळाला सामोरा जात असताना, यावर्षी ओल्या दुष्काळानंतरही शेतकºयांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी संपुर्ण खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला आहे. मोजके शेतकरी सोडले, तर मुगाचे पिकही शेतकºयांच्या हाती लागले नाही. त्यानंतर उडीद,  ज्वारी, सोयाबीन, मका ही पिके पावसामुळे अक्षरश: सडली. कपाशी जरी सध्या शेतात उभी दिसत असली, तरी पावसामुळे सुरूवातीच्या बहरातील बोंडे सडल्याने उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच बाजारभाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले. दरम्यान पावसामुळे झालेली परिस्थिती पाहता, शासनाने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे पुर्ण झाले आणि शनिवारी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. या मदतीवरून शेतकरी संघटनांसह शेतकरीही चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या तर कोणतेही पंचनामे न करता शेतकºयांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये मदत तसेच शेतकºयांच्या पाल्यांची केवळ परीक्षा फी नव्हे तर शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु जाहीर करण्यात आलेली मदत अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकºयांकडूनही खंत व्यक्त करण्यात येत आहे. 

 
परीक्षा शुल्क नव्हे शैक्षणिक शुल्क माफ करा!
शनिवारी राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. परंतु केवळ परीक्षा शुल्क नको, तर शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. परीक्षा शुल्काची रक्कम फार मोठी नसून शेतकरी ती भरू शकेलही, मात्र शैक्षणिक शुल्काची रक्कम प्रचंड असल्याने यात शेतकºयांना दिलासा मिळायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे जाहीर झालेल्या मदतीवरून आक्रोश पाहायला मिळत आहे.

 
शेतकºयांना जाहीर झालेली हेक्टरी ८ हजार रूपयांची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाकिाºयांच्या बैठका सुरू असून लवकरच मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातून सुमारे १० हजार शेतकरी सहभागी होतील.
प्रशांत डिक्कर
जिल्हाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा आघाडी

 
हेक्टरी ८ हजार रूपयात पेरणीचा खर्चही निघू शकत नाही. अशा अवस्थेत वर्षभर उदर्निर्वाह, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न कसा सोडवायचा, याचा विचार मदत जाहीर करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे आंदोलन हाच एकमेव मार्ग आहे.
रमेश बाणाईत
जिल्हाध्यक्ष, रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना 

 
शेतकºयांचे दु:ख काय असते, हे राज्यपालांना काय कळणार? ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या राजकारण्यांनीच शेतकºयांच्या संकटाच्या काळात सत्तेचा खेळ मांडला; त्यामुळे शेतकरी अलगद बाजूला फेकल्या गेला. हेही दिवस निघून जातील. येणारा काळच प्रत्येकाला ज्याची-त्याची जागा दाखवेल.
संतोष कुकडे, शेतकरी सोनाळा

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी