शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Navratra 2020: घटस्थापना कशी करतात? नवरात्रीत कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ते जाणून घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 21:08 IST

Navratra 2020: नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा 'त्रिगुणात्मक' देवींची उपासना केली जाते.

ठळक मुद्देअश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजे 'नवरात्र!'नवरात्रीत नवचंडी, पुण्याहवाचन, सप्तशतीचे पाठ इ. धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते.

नवरात्र म्हणजे जागरण, गोंधळ, देवी उपासना, गरबा नृत्य अशी आपली साधारण समजूत असते. मात्र, बऱ्याचदा पूजेचा विधी माहित नसतो आणि ऐकीव माहितीनुसार नवरात्रीचे व्रत केले जाते. यासाठीच, घटस्थापनेचा विधी कसा करावा आणि सोबतच अन्य धार्मिक गोष्टी काय करता येतील, याची माहिती करून घेऊया. 

'नवरात्र' म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा, असे सर्वत्र गृहित धरले जाते. परंतु, प्रत्यक्षात तसे नसून तिथीचा क्षय किंवा वृद्धीमुळे कधी आठ किंवा दहा दिवस नवरात्र असते. नऊ दिवस किंवा नऊ रात्रीचा कुलाचार असा, या शब्दाचा अर्थ नाही, तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजे 'नवरात्र' होय.

हेही वाचा : Navratri 2020: १७ ऑक्टोबरपासून नवरात्रीचा जागर; ३० नोव्हेंबरपर्यंत येणाऱ्या मोठ्या पर्वाची माहिती एका क्लिकवर

शारदीय नवरात्रात `घटस्थापना' हा मुख्य विधी असतो. जिथे घट स्थापन करणार, ती जागा स्वच्छ करून सारवली जाते. त्यावर  मातीचा ओटा तयार केला जातो. त्यावर घटस्थापना करून त्या घटाखालील मातीत नऊ धान्ये पेरली जातात. त्या घटावरील पात्रात आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवतात. नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचारे पूजा करतात. तिच्यावर रोज एक याप्रमाणे नऊ झेंडूच्या किा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात. काही ठिकाणी मातीचा ओटा न करता, ताम्हनात हळकुंड, सुपारी मांडून त्याची पूजा करतात आणि त्यावर दररोज एक याप्रमाणे नऊ दिवस फुलांच्या माळा सोडतात.

घटावरील पात्रात स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन केले जाते. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ, अष्टमी किंवा नवमीला हवन, उपवास, एकभुक्त किंवा पूर्णवेळ उपास, सुवासिनी तसेच कुमारिका पूजन, भोजन इ. धार्मिक कृत्ये केली जातात. नवरात्राचे नऊ दिवस अखंड दीपाची स्थापना करतात व तो सतत तेवत राहील, अशी दक्षता घेतात.

अश्विन शुद्ध पंचमीला 'ललिता व्रत' नावाचे व्रत करतात. हे काम्यव्रत असून स्त्री-पुरुष दोघांनाही ते करता येण्यासारखे आहे. 'ललिता पंचमी'ची पूजा म्हणून ती प्रसिद्ध आहे. 

नवरात्रात ज्या देवीचे पूजन केले जाते, ती देवी ही महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी 'त्रिगुणात्मिका' आहे. सहाजिकच नवरात्रीत सरस्वती पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. मूळ नक्षत्री देवीची स्थापना, पूर्वाषाढा नक्षत्री पूजन, बलिदान व श्रवण नक्षत्री विसर्जन केले जाते. हा काळ सरस्वती पूजनाचा म्हणजे सरस्वती देवीविषयी कृतज्ञता प्रकट करण्याचा काळ आहे. 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत विशेषत: अष्टमीला काही घरात 'जोगवा' मागण्याचा कुळाचार आहे. देवीच्या नावाने कोरड्या धान्याची भिक्षा मागायची व त्या धान्याचे भोजन प्रसाद म्हणून घ्यायचे. यात गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो. सांपत्तिक स्थिती उत्तम असणाऱ्या श्रीमंत घरातील स्त्रियासुद्धा 'जोगवा' मागण्यासाठी आवर्जून जातात. देवीचा प्रसाद मिळवणे, ही त्यामागील भावना असते, अशी माहिती अभ्यासक आनंद साने देतात. 

याशिवाय नवरात्रीत नवचंडी, पुण्याहवाचन, सप्तशतीचे पाठ इ. धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते. अशाप्रकारे आपणही घटस्थापना करून नवरात्रीत देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन करूया आणि तिची यथासांग पूजा करून पाहुणचार करूया. जगदंबsss उदयोस्तु!  

हेही वाचा: दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

टॅग्स :Navratriनवरात्री