१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:52 IST2026-04-30T12:50:59+5:302026-04-30T12:52:05+5:30
Vaishakh Purnima 2026: १ मे रोजी वैशाख तथा बुद्ध पौर्णिमा आहे, त्या रात्री इच्छित मनोकामनापूर्तीसाठी दिलेला उपाय अवश्य करा.

१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
१ मे २०२६ रोजी येणारी वैशाख पौर्णिमा (जी बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते) ही आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि पौर्णिमेच्या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी फुललेला असतो. या खास मुहूर्तावर चंद्राची उपासना केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. ती उपासना कशी करायची ते जाणून घेऊ.
हे ही वाचा : Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक असते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास मनुष्याला मानसिक शांती मिळतेच, पण त्यासोबतच आर्थिक आणि भौतिक सुखांची प्राप्ती देखील होते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची कमतरता जाणवत असेल, तर १ मे च्या रात्री वैशाख पौर्णिमेला ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी सांगितलेला हा एक सोपा 'पाण्याचा' उपाय नक्की करून पहा.
इच्छापूर्तीसाठी करा 'हा' सोपा विधी
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अवघड विधीची किंवा महाग साहित्याची गरज नाही. केवळ श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे.
वेळ: रात्री ९:०० ते १२:०० च्या दरम्यान हा उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरते.
साहित्य: एक तांब्या किंवा पेला भरून शुद्ध पाणी आणि थोड्या अक्षता (अखंड तांदूळ).
हे ही वाचा : अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा
विधी :
१. रात्री ९ ते १२ या वेळेत एका स्वच्छ पेल्यात पाणी घ्या.
२. त्या पाण्यात थोड्या अक्षता टाका. (अक्षता पांढऱ्या रंगाच्या आणि अखंड असाव्यात, कारण पांढरा रंग चंद्राला प्रिय आहे).
३. त्यानंतर हे पाणी हातात घेऊन चंद्राच्या दिशेने पाहत (अर्घ्य देताना) हळूहळू सोडा.
४. अर्घ्य देताना मनातल्या मनात चंद्र देवाचे स्मरण करा.
हे ही वाचा : Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
या उपायाचे महत्त्व काय?
असे मानले जाते की, वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर चंद्राला अर्घ्य दिल्यास, तुमच्या मनात असलेल्या पण प्रगट न केलेल्या इच्छा देखील चंद्र देव पूर्ण करतात. ज्या गोष्टींची तुम्हाला आयुष्यात कमतरता जाणवते, ती उणीव भरून काढण्यासाठी चंद्राची ही शीतलता आणि ऊर्जा कारणीभूत ठरते. पाहा व्हिडीओ -