शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

प्रभात बुडूख बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले ...

प्रभात बुडूख

बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले जातात. मात्र, अनेकजण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढतोय. प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न व प्रशासनाकडून काय करणे गरजेचे आहे, याची जाणीव असल्यामुळे आणि जिल्हाधिकारी या प्रमुख पदावर असल्यामुळे तो प्रयत्न सतत असेल. यासाठी लोकप्रतिनिधींकडूनदेखील सहकार्य मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गंत संवाद असणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषय नवीन असल्यामुळे माहिती नसते आणि फायली जागेवर ठप्प राहतात. त्यामुळे त्यांना संबंधित कामांचे प्रशिक्षण पुढील काळात दिले जाईल. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सुसंवाद असेल, तर अनेक प्रश्न सुटतात, असे ते म्हणाले.

लवादातील प्रकरणांसाठी सुटीचा दिवस

भूसंपादनाची अनेक प्रकरणं मागील काही काळापासून लवादाकडे प्रलंबित होते. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचा उपयोग केला जाणार आहे. त्याचे कामदेखील सुरू केले असून, काही प्रकरणांचा निपटारादेखील करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रकरणं किचकट असले तरी कायद्याप्रमाणे निकाली काढण्यात येणार आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखता येऊ शकतात

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात सखोल माहिती घेतली, त्यावेळी कळले की कर्ज हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. ते भेटायला आले तर त्यांना वेळ देऊन समस्येचे निरसन करावे. शेतकऱ्यांनीदेखील खचून न जाता प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावागावांत जाऊन द्यावी व त्याचा लाभ कसा देता येईल याविषयी धोरण राबवावे, तर आत्महत्या रोखण्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

===Photopath===

070321\072_bed_18_07032021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप