शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘तेल्या’मुळे डाळिंब बागांवर जेसीबी फिरविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब ...

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब बागा नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झालेली आहे. बाजारी मागणी चांगली असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी मोठा आर्थिक भार सोसत डाळिंब लागवडीकडे वळला. अरणगाव, खडकी, खंडाळा, वाळकी, पिंपळगाव लांडगा, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी या भागात डाळिंब अधिक आहे. डाळिंब फळांना मिळणारा बाजारभाव आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक धाडस करीत डाळिंब पिकांची लागवड केली. यातून तालुक्यात डाळिंब बाग लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत पोहोचली.

मात्र, सध्याच्या विपरीत हवामान व वातावरणाचा परिणाम या डाळिंब फळबागांवर होत आहे. यातून तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळांच्या उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होत असल्याने तालुक्यातील जवळपास ८o टक्के डाळिंबांचे क्षेत्र जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वातावरणातील अतिआर्द्रता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. सततच्या रासायनिक खतांच्या डोसामुळे बागामधील उष्णतेचे प्रमाण वाढते. यामुळे बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे. यातून काही अरणगाव, खडकी, खंडाळा यांसारख्या गावातील शेतकऱ्यांनी वेळीच या रोगावर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे या भागातील काही डाळिंब फळबागा तग धरून आहेत.

----

काय आहेत तेल्याची लक्षणे..

डाळिंब बागांवर तेल्या रोगामुळे पानावर ठिपका पडतो. फळांवर हिरव्या रंगाचा डाग येतो. या रोगाचा हल्ला वाढत जाऊन फळे लवकर फुटतात. त्यातून तेलकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. यामुळे फळांचे उत्पादन कमालीचे घटते. फळे खराब निघतात.

-----

काय घ्यावी खबरदारी

डाळिंब पिकांवर रासायनिक खतांचा व औषधांचा वापर कमी करावा. जैविक खते, गांडूळ खते, शेण खत, शेंगदाणा खत यांचा वापर करावा. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते. तरी पिकांवरील उष्णतेचे प्रमाण कमी राहते. वातावरण पाहून रासायनिक खतांच्या मर्यादित स्वरूपात वापराचा निर्णय घ्यावा.

----

माझे पोखर्डीत डाळिबांची अडीच हजार झाडे होती. मात्र, तेल्या रोगामुळे ही सर्व झाडे काढून टाकली. आता अरणगावमध्ये चार हजार डाळिंबाची लागवड केली आहे. रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा वापर सुरू केल्याने डाळिंब बाग तग धरून आहे.

- अक्षय कराळे,

डाळिंब उत्पादक, पोखर्डी

----

०१ डाळिंब, १