शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील शेतकरी मोदींच्या बरोबर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 10:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नविन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शिर्डीत व्यक्त केले.

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नविन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शिर्डीत व्यक्त केले.

मुख्यमंत्री चव्हाण अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही नववर्षाचा श्रीगणेशा साईदर्शनाने करत आहेत. या निमित्ताने नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईनगरीत दाखल झालेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०२० वर्ष संकट, दु:ख व कष्टाने भरलेले होते. कोरोनाने अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे प्राण गेले. या वर्षाला निरोप देतांनाच कोरोना या देशातून व जगातून जावो. अर्थव्यवस्था सुरळीत होवो. सर्वांचे कल्याण होवो यासाठी आपण बाबांना साकडे घातल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या वर्षात अर्थव्यवस्था मजबूत करणे, रोजगार निर्मीती करणे, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे. राज्यातील आया-बहिणींना अधिक सुरक्षीतता उपलब्ध करणे व गुंडगिरी संपवणे हा आपला नवीन वर्षाचा संकल्प असल्याचेही चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर