शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा खर्च लाखांमध्ये, उत्पन्न मात्र हजारोतही नाही

By admin | Updated: October 25, 2014 01:51 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

महागाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या घरात काहीही येऊ शकले नाही. २० एकरातील २० पोते सोयाबीन तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. २० एकर सोयाबीनचा खर्च २ लाख ४६ हजार रुपये व उत्पन्न मात्र ६० हजार रुपये अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असल्याने यावर्षी दिवाळीत अपेक्षित विक्री झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात मंदीची लाट दिसून येत आहे. दरवर्षी महागाव तालुक्याला केवळ कापड व्यवसायात दोन कोटी रूपयांच्या घरात उलाढाल होते. परंतु यावर्षी मात्र कापड व्यवसायी चांगलेच अडचणीत सापडले. यावर्षी त्यांचा अनुभव काही वेगळा आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात कापड विक्रीतून केवळ लाखो रूपयांची उलाढाल झाली आहे. किराणा व्यापाऱ्यांचीसुद्धा त्यापेक्षा वेगळी अवस्था नाही. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मंदीची लाट असल्याचे दिसून येते. करंजखेड येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यापेक्षा त्यामध्ये जनावरे सोडने पसंत केले. उटी येथील शेतकरी आत्माराम गावंडे यांना २० एकरात, २० क्विंटल सोयाबीन झाल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीनला आलेला खर्च पाहता २८ रुपयांची एक याप्रमाणे ४० बॅग लागल्या १ लाख १२ हजार रुपयांच्या बियाण्यांची दोन वेळा पेरणी केली. तीन हजार रुपये किमतीच्या औषधांच्या दोन वेळा फवारणी केली. निंदणासाठी ४० हजार रुपये, राण तयार करायला आलेला खर्च वेगळा. अशा प्रकारे २० एकरला २ लाख ४६ हजार रुपये खर्च आला. उत्पन्न मात्र केवळ २० क्विंटल आजच्या भावाने ६० हजार रुपये या मालाच्या हाती आले आहे. हिच स्थिती सधन शेतकऱ्यांची आहे. इतरांची परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. यासाठी सोयाबीनचे सामूहिक पंचनामे होणे गरजेचे आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव खडकेकर यांनी त्याची सुरूवात केली आहे. हिवरा सर्कलच्या सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून सोयाबीनचे पंचनामे तयार करायला सांगितले आहे. तरच शासनासमोर काहीतरी मागता येणार आहे. सोयाबीनचे पंचनामे नसतील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इतर कुठल्याही आधारावर मिळने अशक्य आहे. त्यासाठी नवनिर्वाचित आमदार राजेंद्र नजरधने यांनी तालुक्यातील सोयाबीनचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासनाची बैठक घ्यावी आणि कृषी विभाग व महसूल विभागाला यामध्ये गांर्भीयाने लक्ष घालण्यास सांगून पंचनामे करण्यास भाग पाडावे. अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)