शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

गाडेघाटातील आदिवासी जगताहेत उपेक्षिताचे जीणे

By admin | Updated: May 26, 2016 00:03 IST

राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही.

समस्यांची गर्दी : शासकीय योजनांचा पत्ता नाहीकिन्ही (जवादे) : राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही. या बाबी तर दूर मुलभूत सुविधाही त्यांना उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवार गाठावे लागते. एवढेच काय तर सदर गाव ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येते तेथील सचिवाचेही कधी या गावाला दर्शन झाले नाही. समस्यांच्या गर्दीत हे गाव सापडले आहे. पिंपरी (सावित्री) या ग्रामपंचायत अंतर्गत गाडेघाट या गावाचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडून कुठल्याही योजनांचा लाभ या भागाला दिला जात नाही. वैयक्तिक सुविधाही पुरविल्या जात नाही. आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या या गावामध्ये गावकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी साधा हातपंपही नाही. गावशिवारात असलेल्या शेतातून पाणी आणावे लागते. सांडपाण्याच्या नाल्या नेमक्या आहे. त्याही कधी स्वच्छ केल्या जात नाही. कचऱ्याने भरलेल्या नालीमुळे दुर्गंधी वाढली आहे. ग्रामपंचायतीचा कर्मचारी कधीही या भागात फिरकत नाही. वीज खांबावर पथदिवे नाही. अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रचंड हाल सोसावे लागते. सर्वत्र पाणी साचून राहते. कालांतराने त्याचे रूपांतर गटारामध्ये होते. त्यात तयार होणारे डास आरोग्यासाठी घातक ठरते. पिंपरी(सावित्री) ग्रामपंचायतीला असलेल्या ग्रामसचिवाचे गाडेघाटकडे दुर्लक्षच नाही, तर त्यांचे कधी या गावाला दर्शनच झाले नाही. काम पडल्यास आदिवासी बांधवांना त्यांचा शोध घ्यावा लागतो. शासनाच्या विविध योजना पिंपरी(सावित्री)मध्येच जिरतात. पदाधिकारी आणि सचिवांना या गावाशी काहीएक देणे-घेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोप या गावातील रामेश्वर सिडाम यांनी केला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर आदी योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचत नाही. पात्र असूनही लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर दिले जात नाही. परिणामी या गावातील नागरिकांना उपेक्षित जीणे जगावे लागत आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर) राळेगाव तालुक्यातील गाडेघाट म्हणजे समस्यांचे माहेरघर अशी अवस्था झाली आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही कधीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आमचा उपयोग केवळ मतदानापुरताच काय, असा सवाल आहे.