शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या महाग सापळ्यात शेतकरी ‘ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

ठळक मुद्देबाजारात पाच हजार कृषीचे दर आठ हजार रुपये : सोलर लाईट ट्रॅप खपविण्यासाठी कृषी विभागावर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीच्या त्रासाने शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विद्यापीठाने मात्र या संकटाला संधी मानून नफेखोरीचा मार्ग अवलंबलेला आहे. बोंडअळी व इतर कीटकांपासून बचावासाठी शेतकऱ्यांना बाजारात ५ हजार रुपयांचे कामगंध सापळे (ट्रॅप) उपलब्ध आहेत. मात्र कृषी विद्यापीठाने स्वत:चे संशोधन असल्याचा आव आणत चक्क आठ हजारांपेक्षा जास्त किमतीचे सापळे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांवर दबाव वाढविला जात आहे.विदर्भात मागील दोन-तीन वर्षात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे कपाशी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सदर ट्रॅप बनविण्यासाठी विद्यापीठाने केव्हापासून संशोधनाचे काम सुरू केले, याची कुठलीही माहिती विद्यापीठाने दिलेली नाही. सदर उपकरणाची चाचणी घ्यावी लागते. यात किती किडे, मित्र किडे पकडल्या गेले याबाबतही चाचणी घेतली जाते. परंतु हे सापळे विद्यापीठाने इतक्या तत्परतेने बाजारात आणण्याची घाई केली आहे, की त्याची चाचणी झाली किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, पाच वॅटचा यूवी बल दोन एकर परिसरातील किडीला आकर्षित करू शकतो, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही लोकप्रतिनिधीसमोर या सापळाची चाचणी करण्यात आली नाही. विद्यापीठाने हे सापळे तयार केले. ते बाजारात आणण्यापूर्वी वितरक नेमणे, शेतकऱ्यांशी संपर्क करणे आदी बाबी करावयास हव्या होत्या. त्या सर्व प्रक्रियेला धाब्यावर बसवून सदर ट्रॅप थेट बाजारात दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागावर दबाव टाकून हे सापळे शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने ८ हजार ८०० रुपये एवढी किंमत या सापळ्यांसाठी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.शेतकऱ्यांची तक्रार दुर्लक्षितशेतकºयांपर्यंत नवे संशोधन पोहोचविणे हा कृषी विद्यापीठाचा हेतू असतो. त्यात विद्यापीठ बºयाचदा कमी पडते. आता सोलर लाईट ट्रॅप हे संशोधन विद्यापीठाने आणल्याचा दावा केला जात आहे. बाजारात २ ते ५ हजारात ट्रॅप उपलब्ध असताना शेतकऱ्यांनी ८ हजार ८०० रुपयांचा विद्यापीठाचा ट्रॅप विकत घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रारही केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांवर हे सापळे थोपविले जाणार आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या सोलर लाईट ट्रॅपची किंमत कमी असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती