शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’पासून भाजपाचा यू टर्न

By admin | Updated: August 27, 2015 00:11 IST

केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे.

काँग्रेसचा आरोप : गावागावांत जनजागृती अभियानयवतमाळ : केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी येथील आझाद मैदान स्थिती महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित पत्रपरिषदेत केला. ‘केंद्र व राज्याच्या कारभाराचे पर्दाफाश’ जिल्हास्तरीय आंदोलन काँग्रेसकडून काळ्या फिती लावून येथील आझाद मैदानातील गांधीभवनात करण्यात आले. आंदोलनानंतर पत्रपरिषदेत शिवाजीराव मोघे बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना कशा फसव्या आहेत याचीही माहिती दिली. शासनाने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. केवळ भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी काही करण्याची शासनाची इच्छा नाही. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काँग्रेसने त्यांचा हा डाव उधळून लावल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे कृषीक्रांती ही नावालाच असल्याचे ते म्हणाले. शासन म्हणजे सातबारा कोरा करू पण कर्जमाफी नाही. कर्जमाफी शिवाय सातबारा कोरा कसा होणार, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने तिजोरी खाली करून ठेवली, असा भाजपाचा आरोप आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वाधिक कर्ज यापूर्वी भाजपा-सेनेच्या काळातच राज्यावर झाले आहे. त्यामुळे आमच्यावरील हा आरोप निराधार आहे. अशाप्रकारे आंदोलने हे यापुढेही सुरूच राहणार असून गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विजय खडसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजयाताई धोटे, आर्णीचे नगराध्यक्ष आरिज बेग, तातू देशमुख, अरुण राऊत, देवानंद पवार, आनंद गायकवाड आदींचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कांद्याचे हार अन् हाताला काळया फितीबुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदविला. अनेक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घुमजाव करणाऱ्या विधानावर यावेळी तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. पंतप्रधानांच्या वक्तव्याची पोलखोल करणारी कॅसेट यावेळी लावण्यात आली होती. त्यांच्या विधानाची वचनपूर्ती होणार कधी, असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.