शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा भाव आणखी गडगडला; शेतकरी धास्तावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या ...

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जुन्या सोयाबीनचा दरही कोसळला असून, ६०००-७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जुन्या सोयाबीनला १० हजारांवर भाव होता. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जुन्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती, तर प्रतिक्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

.....................

भाव आणखी गडगडणार

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. एकीकडे रासायनिक खते, बियाणे, मजुरी आदींचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हमीभावात फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांनंतर सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ६००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

..................

सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी?

कोट

लागवड खर्चात एकीकडे भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाहीत. १५ दिवसांपूर्वी सोयाबीन तेजीत होते. आता नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

- हरीश चौधरी

शेतकरी, पार्डीटकमोर

...................

भारतात मुबलक प्रमाणात शेतमाल उपलब्ध असताना बाहेरील देशातून शेतमाल आयात करण्याला केंद्र सरकार परवानगी देते. त्यामुळे देशातील शेतमालाला चांगला बाजारभाव कसव मिळेल? सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांचा फटका कोट्यवधी शेतकऱ्यांना बसत आहे.

- गजानन गोटे,

शेतकरी, तोंडगाव