शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशक फवारणीच्या मार्गदर्शनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:31 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: किटकनाशकाच्या फवारणीमुळे इंझोरी येथील सहा मजुरांना विषबाधा झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पृष्ठभुमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात मार्गदर्शन मोहिम राबविणे आणि आरोग्य विभागाने इंझोरी येथे भेट देऊन पाहणी करणे गरजेचे होते; परंतु कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही.  इंझोरी शिवारात सध्या पिकांवरील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. आपले व परिवारांचे पोट भरण्याकरिता काही परिसरातील मजुर ठेका पध्दतीने ही कामे घेऊन ती कामे लवकर संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस काबाड कष्ट करीत आहेत. या मजुरापैकी सहा मजुरांना थकवा, उलटी, जेवण पाणी न पचणे आदिचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर फवारणीचे किटनाशक औषध शरीरात गेल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये नंदु श्रीकृष्ण काळेकर (२५), अश्विन दिलीप तायडे (२८), गोलु चंद्रभान लायबर (३०), कृष्णा पुंडलीक दिघडे (४०), चंदाबाई संजय दिघडे (४०) व जामदरा येथील गणेश धुरट (३५), या मजुरांचा समावेश आहे. यापैकी अश्विन तायडे, गोलु लायबर, व गणेश धुरट यांच्यावर अकोला व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहापैकी तीन मजुरांना चार दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यानंतर दिलिप तायडे वगळता इतर दोघांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. अद्याप येथील काही मजुरांच्या ठेका पध्दतीने फवारणी सुरु असून, कदाचीत आणखी काही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह व कृषी विभागाने इंझोरी जिल्हाभरात फवारणीकरिता मार्गदर्शन करणे अपेक्षीत होते; परंतु चार दिवस उलटले तरी, कृषी विभागाची मार्गदर्शन मोहीम व्यापक झाली नाही इंझोरीतही या दोन्ही विभागाचा कर्मचारी चार दिवसांतही आला नाही.

इंझोरी येथील कृषी सहाय्यक आणि मंडळ कृषी अधिकारी हे नियमित गावांना भेटी देत असून, त्यांनी याबाबत मार्गदर्शनही केले आहे. याबाबत कृषी विभाग सजग आहे. त्यातच विषबाधा झाल्याची कोणतीही तक्रार मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे आली नाही. तथापि, शनिवारी सकाळी येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल.-सचिन कांबळे,तालुका कृषी अधिकारी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी