शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

गव्हापेक्षा शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:20 IST

अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे खरीप हंगामात आलेला तोटा रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती झालेल्या पेऱ्यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना आजपर्यंत २४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली असून, यात हरभरा पिकाचे प्रमाण १८ हजार हेक्टर, तर गहू पिकाचे प्रमाण ५ हजार ५०१ हेक्टर आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना कृषी विभागाने १ लाख ३० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.तथापि, अवकाळी पावसाने आॅक्टोबरच्या मध्यंतरापासूनच थैमान घातल्याने रब्बी पिकांची पेरणी खोळंबली. त्यामुळे गळीत पिकांच्या क्षेत्रावर परिणाम झाला, तर तृण पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी होते. सद्यस्थितीत १८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गहू पिकाचे क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाल्याच्या कृषी विभागाच्या अहवालावरुन शेतकºयांनी गव्हापेक्षा हरभऱ्या पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कारंजा तालुक्यात १७४८ हेक्टरवर होणार रब्बीची पेरणीकारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षांत कारंजा तालुक्यात १ हजार ७४८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात भरपूर पाउुस झाल्याने उपलब्ध जलस्त्रोतात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करून रब्बी पेºयात वाढ करावी असा मानस शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पेरणी अहवालावरुन हरभºयाच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात कांरजा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २३५ हेक्टरवर हरभरा त्यापाठोपाठ ४७० हेक्टरवर गहू तर १२ हेक्टरवर करडई आणि ३१ हेक्टरवर रब्बी हंगामातील इतर पिके पेरल्या जाण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी