शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन योजनेचे अनुदान अद्याप अप्राप्त

By admin | Updated: March 7, 2016 02:18 IST

शेतकरी हवालदिल: १५.२२ कोटींच्या अनुदान रकमेची शेतक-यांना प्रतीक्षा.

वाशिम: ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे जवळपास ९७00 शेतक-यांचे १५.२२ कोटी रुपयांचे अनुदान एका वर्षानंतरही शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनेंतर्गतच्या अनुदानातून शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकर्‍यांची निवड केली जाते. २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यामध्ये मानोरा तालुक्यातील ८३0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या सर्व पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल एका वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनुदानाअभावी सिंचन सुविधा उपलब्ध करणे कठीण होऊन बसले आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाही शेतकर्‍यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अगोदरच तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. अशातच शासनही अनुदानाची रक्कम देत नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडत आहे. दरम्यान, ठिबक व तुषार सिंचन योजनेंतर्गतचे अनुदान शेतकर्‍यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून माजी जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे व भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजानी यांनी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन दिले. मानोरा तालुका व जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असतानाच, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाने शेतकर्‍यांना हवालदिल केले आहे. कमी पावसातही शेतकरी तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती ओलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अनुदान मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी केला. मानोरा तालुक्यातील लाभार्थींंनी उसणवारीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. आता सिंचन साहित्याचे अनुदान मिळत नसल्याने उसणवारीची परतफेड कशी करावी? या प्रश्नाने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शासनकर्त्यांंनी शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा हेमेंद्र ठाकरे व युसूफ पुंजानी यांनी दिला.