शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोट्यवधी रुपये खर्चूनही सामाजिक सभागृहे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 3:10 PM

वाशिम जिल्ह्यातील शंभरावर सामाजिक सभागृहे सद्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देसामाजिक सभागृहांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावकऱ्यांना लग्नसोहळ्यांसह इतर काही कार्यक्रम घेताना अडचण जात आहे. प्रशासनाचे या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम अथवा इतर कौटुंबिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून करोडो रुपये खर्चून सामाजिक सभागृहे उभारण्यात आली. विद्यार्थी, तरूणांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा उभारल्या; मात्र, यातील बहुतांश वास्तूंची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. जिल्ह्यातील शंभरावर सामाजिक सभागृहे सद्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कचरा, धूळ, स्वच्छतागृहांची दुरवस्था, खिळखिळीत झालेल्या खिडक्या अशी अवस्था या सभागृहांची झाली आहे.जिल्ह्यातील गावांमध्ये आमदार निधीतून सामाजिक सभागृह, सिमेंट रस्ते, व्यायामशाळा, स्मशानभूमी, शाळा खोली विशेष दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. त्यातील सामाजिक सभागृहांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावातील कुठलेही मंगलकार्य साजरे करण्यासाठी गावकऱ्यांना हक्काचे व सुविधांनी सज्ज ठिकाण म्हणून या सभागृहांचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र तुलनेने जुन्या झालेल्या अनेक ठिकाणच्या सभागृहाची मोठ्या प्रमाणात पडझड होण्यासोबतच काही ठिकाणी सभागृहांचा वापर चक्क गुरांचा गोठा म्हणून केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही सभागृहांसभोवताल कचºयाचे ढीग साचत असल्याने मूळ उद्देशांना हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

सभागृहांची डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या सामाजिक सभागृहांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना लग्नसोहळ्यांसह इतर काही कार्यक्रम घेताना अडचण जात आहे. अशा स्थितीत सभागृहांच्या डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष पुरविल्यास ग्रामस्थांची होणारी गैरसोय टळू शकते. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाचे या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात उभारण्यात आलेली अनेक ठिकाणची सामाजिक सभागृहे सद्य:स्थितीत जुनी झाली असून आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून त्याचा वापर केला जात नाही. प्रशासनाने सभागृहांच्या दुरूस्तीकडे लक्ष पुरविल्यास चित्र बदलू शकते.- प्रदिप शिंदे, पांगरखेडा (ता.मालेगाव)

आमदार निधीमधून दरवर्षी इतर कामांसोबतच मागणीप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सभागृह उभारण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी ही सभागृहे सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.- भारत वायाळजिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक