शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 00:44 IST

अखेर स्वकष्टाने व हिमतीवर मिळवली सैन्य दलाची ती मानाची ‘कॅप’

- आशिष राणेवसई : भारत देशासाठी शहीद झालेले तरुण मेजर प्रसाद महाडिक यांच्या वीरपत्नीने सैन्यात जाऊन ‘लेफ्टनंट’ होत आपल्या शहीद पतीला एक अनोखी आणि मानाची ‘श्रद्धांजली’ अर्पण केली आहे. जिद्ध असेल तर यश दारात आहे आणि अखेरीस वीरपत्नी गौरी यांनी स्वकष्टाने व हिमतीवर सैन्य दलाची ती मानाची ‘कॅप’ मिळवली आहे.विरारमध्ये स्थायिक आणि गुहाघरच्या कुटगिरीचे सुपुत्र असलेले प्रसाद ऊर्फ राजू महाडिक हे मेजर पदावर भारतीय सैन्यात देशाची सेवा करीत असताना ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे शहीद झाले होते. दि. १५ फेब्रुवारी २०१५ ला त्यांचा गौरी पवार यांच्याशी विवाह झाला होता. आपले पती सैन्यात आणि तेही एका महत्त्वाच्या सीमेवर तैनात असतात हे माहीत असतानाही गौरी यांनी अत्यंत धाडसाने त्यांची साथ केली. मात्र ही साथ अवघ्या दोन वर्षातच कायमची सुटली. मेजर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अशा अटीतटीच्या परिस्थितीत त्यानंतरही आपल्या पतीचे देशसेवेचे कार्य पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार गौरी यांनी केला आणि तशी इच्छा त्यांनी त्यांच्या सासरी व्यक्त केली. त्यांनी लागलीच होकार दिल्यानंतर गौरी यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून लष्करी भरतीची तयारी सुरू केली. त्यानंतर सैन्य दलाच्या सिलेक्शन बोर्डाची आॅनलाईन परीक्षा दिल्यावर त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुढे चेन्नईला लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षण केंद्रात ४६ आठवडे खडतर प्रशिक्षण घेऊन आता त्या ‘लेफ्टनंट’ म्हणून देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्या आहेत.मेजर प्रसाद यांचीती आठवण!तुला जर ही मानाची ‘कॅप’ घालायची इच्छा असेल तर तू सैन्यात भरती हो...! पती मेजर प्रसादसह सेल्फी काढण्यासाठी सैन्य दलाचे चिन्ह असलेली ही ‘कॅप’ गौरी यांनी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी अभिमानाने सांगत, तुला जर ही ‘कॅप’ घालून फोटो काढण्याची तीव्र इच्छा असेल तर तू सैन्यात दाखल हो आणि स्वत: कॅप मिळव, असा मोलाचा सल्ला त्यांनी त्या वेळीच दिला आणि आज अखेर गौरी यांनी स्वकष्टाने व स्वत:च्या हिंमतीवर ही सैन्य दलाची मानाची ‘कॅप’ मिळवलीच!

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानVasai Virarवसई विरार