शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वरठा पाड्यात बारमाही तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 13, 2016 01:49 IST

यावर्षी तालुक्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे जोरदार चटके बसू लागल्याने नदी, नाले, विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावपाड्यातील आदिवासींना

वाडा : यावर्षी तालुक्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे जोरदार चटके बसू लागल्याने नदी, नाले, विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावपाड्यातील आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील वरठा पाडा (नाणे) येथील महिलांना बारमाही पाण्यासाठी नदीपात्रातील खड्ड्यातील पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील सुरेश वरठा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील आदिवासींनी प्रशासनाला दिला आहे.शासकीय अनास्थेमुळे या भागातील नागरीकांना, पाणी, वीज, रस्ते या सारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या गावाला लागून बारमाही वाहणारी वैतरणा आहे. मात्र शासकीय अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावातील आदिवासींच्या घशाला ५० वर्षापासून कोरड पडली आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून या भागातील पाणी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.या गावातील आदिवासी ग्रामस्थ रमेश वरठा, नामदेव तांडेल, शंकर वरठा, रामदास वरठा, अमृत तांडेल, वासुदेव वरठा, बाळकृष्ण वरठा, परशुराम वरठा यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या केल्या त्यासाठी हेलपाटे मारून देखील या आदिवासींना साधा हातपंप देखील मिळाला नसल्याने ते निराश झाले असून प्रशासनावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.