शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

जव्हारचा उपजिल्हा दर्जा परत मिळवणार - सुनील भुसारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:37 AM

जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे. आपल्या भागातील सर्व बांधवांची कामे जव्हारमध्येच व्हावीत, असा यामागचा उद्देश असून सरकार आपल्या दारात ही योजना नेमकी काय असते हे कृतीतून या भागातील लोकांना दाखवून देईन, असे प्रतिपादन विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केले. केव येथे आयोजित नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या नागरी सत्कार प्रसंगी भुसारा बोलत होते.खावटी कर्ज वाटप योजना, आरोग्याच्या विविध योजना लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या योजना आवश्यक आहेत, त्या सगळ्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही कटिबद्ध असून तशा योजनाही आम्ही आखल्या आहेत. याप्रसंगी या भागातील कुर्झे गटाचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य शिवा सांबरे, संदेश ढोणे, गणेश कासट, पं.स. सदस्य रुचिता कोरडा, दयानंद सुतार आणि केवग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्र म केव ग्रामस्थांनी आयोजित केला होता.अपेक्षाभंग होणार नाहीज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे वचन भुसारा यांनी दिले.येत्या काळात आमदारांच्या सहकार्याने या भागातील विकासाची कामे करावयाची असल्याचे जि. प. सदस्य शिवा सांबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर