शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खतसाठा पावसाने भिजला

By admin | Updated: August 8, 2015 02:27 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

वर्धा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परंतु रेल्वेच्या माध्यमातून सोमवार वर्धा रेल्वेस्थानकावर आलेला खतसाठा सततच्या पावसामुळे भिजला. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला व कृषी विभागाला बसला आहे.शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहेत. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काही वर्षापासून गोधन कमी झाल्यामुळे शेणखताचे प्रमाण कमी झाले आहे. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी साहजीकच बळीराजादेखील रासातनिक खतांना प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उणीव भासू नये याकरिता मोठ्या प्रमाणात खतसाठा आणला जातो. खतासाठा जिल्ह्यात आणण्यासाठी रेल्वेचे माध्यम अत्यंत सुरक्षित असल्याचे समजले जाते. सोमवार’ वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर मालधक्क्यावर हा रासायनिक खताचा साठा उतरविण्यात आला. सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात या खतसाठ्याला पावसापासून बचावार्थ त्यावर ताडपत्री टाकण्यात आल्या. पण खतसाठा जास्त असल्यामुळे सर्व खतासाठा झाकण्यात येवू शकला नाही. त्यातच टाकण्यात आलेल्या ताडपत्र्या हवेमुळे उडाल्या. परिणामी खतसाठा मोठ्या प्रमाणात भिजला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या खतसाठ्यामध्ये डीएपी, १५.१५.१० तसेच यरिया खतांचा समावेश होता. शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी करावी लागणारी धावपळ पाहता खतांचा पावसापासून कसा बचाव करता येईल, याकरिता रेल्वे प्रशासनाने सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)