शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 9:58 PM

शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली.

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याने त्यांना वेळीच सुधारण्याचा दम देण्यात आला. अंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करणाºया योजनेला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना खासदार तडस बोलत होते.कडक उन्हाळ्याच्या दिवसात देवळीत पाणीबाणी असून कधी दिवसाआड तर कधी दर दोन दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. सार्वजनिक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहे. विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने त्या सुद्धा अखेरच्या घटका मोजत आहे. अशा परिस्थितीत शहरात पाणी पुरवठा करणाºया ३४ कोटी खर्चाच्या योजनेचे काम पुढे जात नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या योजनेत समाविष्ट असलेली काही महत्वाची कामे गेल्या सहा वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.अंदोरी गावातून वर्धा नदी पात्रातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत रस्त्याचे बांधकाम न केल्याने पावसाळ्याचे दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याचे ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसविले नसल्याने कधीकाळी लाईन गेल्यानंतर संपूर्ण पाणी पुरवठा ठप्प पडत आहे. शहरातील मधुसूदन ले आऊट येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ले आऊट मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात न आल्याने तसेच या परिसरातील चार पदरी रस्त्याचे बांधकाम ही पाईपलाईनच्या कामात अडकल्याने अडचण निर्माण झाली आहे. शहरातील ले आऊटमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु जीवन प्राधिकरणाने वर्षभरापासून घरगुती नळजोडणी न दिल्याने येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. शहरातील अंतर्गत पाईप लाईन अजून टाकावयाची आहे.ठरलेल्या अटीनुसार योजनेचे काम सन २०१५ पर्यंत पूर्णत्वास न्यावयाचे होते. मात्र या कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे योजनेला सन २०१८ पर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. असे असले तरी अद्यापही योजनेचे बहुतांश काम थंडबस्त्यात आहे. योजनेनुसार प्रत्येक घरी वॉटर मीटर बसवून २४ तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु योजनेचा संबंधीत ठेकेदार व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या नियोजन शून्यतेमुळे ही योजना शेवटच्या टप्प्यात रखडली आहे. योजनेला वेळ झाल्याने यावरचा खर्च सुद्धा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. निधीची व्यवस्था करतो पण कामात कुचराई चालणार नाही असा दम खासदार तडस यांनी अधिकाºयांना दिला. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदु वैद्य, उपविभागीय अभियंता मदनकर, अंकुश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित होते.अठरा कोटींची गरज दीड कोटीच मिळालेनिधीची अडचणी असल्याने योजनेचे काम खोळंबले असल्याचे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांनी सांगितले. यासाठी ३ कोटीची मागणी केली असता फक्त दीड कोटी देण्यात आले.ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी अजून १८ कोटीची आवश्यकता असल्याचे एकट्या एक्स्प्रेस फीडरचा खर्च दीड कोटीच्या घरात असल्याने कार्यकारी अभियंता वाघ यांनी खासदार तडस यांना सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई