देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिल्हा पंचायतीत ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती थांबावी आणि एकूणच राजकीय स्थिरता यावी यासाठी गोव्यातील मागची जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीवर घेण्यात आली होती. ...
काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात सामील झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडे सरकारने केलेला जमीन खरेदी व्यवहार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी केला आहे. ...
संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...
मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...