शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

By जितेंद्र कालेकर | Updated: September 4, 2024 17:01 IST

काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी सकाळी पॅराफॉर्मल्डिहाइड या रसायनाने भरलेल्या ३४ टनाच्या बॅगा घेउन जाणारा ट्रक पातलीपाडा ब्रिजवर पलटी झाल्याची घटना घडली. त्यामुळे सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या पाच ते सहा तासांच्या कालावधीमध्ये ठाणे ते घाेडबंदर या मार्गावर आधी वाहतूक काेंडी झाली. त्यानंतर अनेक खासगी बस आणि दुचाकीस्वारांनी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावरही उलट दिशेने वाहने आणली. त्यामुळे घाेडबंदर ते ठाणे हा दुसराही मार्ग बंद पडला. त्यामुळे या काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रुजदार (५०) हा किरकोळ जखमी झाला असून तो ट्रॅक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

ट्रक चालक रुजदार हा नवी मुंबई न्हावा शेवा येथून रसायनाने भरलेल्या बॅगा असलेला ट्रक घेऊन बावल-हरियाणा येथे निघाला होता. या ट्रक घोडबंदर रोडने जाताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर ७.४५ वाजण्याच्या सुमारास उलटला. या अपघातात चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यामुळे वाहतुक कोंडीला सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मंजूषा भाेगले यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या ट्रकमध्ये रसायनाने भरलेल्या बॅगा असल्यामुळे त्याची झळ या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांसह वाहतूक पाेलिसांनाही बसली. अनेकांना डाेळयांनाही झळझळ झाली. याच दरम्यान, तीन माेठया हायड्रा मशीनच्या मदतीने उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. हा ट्रक तीन तासांनी बाजूला करण्यात आला. याचदरम्यान पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता पातलीपाडा ते हिरानंदानी इस्टेट हा वाहतुकीसाठी बंद केला हाेता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.

शाळकरी मुलांची रखडपट्टी-दुपारी शाळा सुटल्यानंतर अनेक मुले स्कूल बसमध्ये दाेन ते तीन तास अडकली हाेती. त्यामुळे दुपारच्या सत्रातील मुलांना नेण्यासाठी बसच उपलब्ध न झाल्याने पालकांना आपल्या वाहनांनी मुलांची शाळा गाठण्यासाठी माेठी कसरत करावी, लागल्याचे एका पालकांने सांगितले. अनेक मुले बसमध्येच अडकल्याने त्यांचे पालकही रडकुंडीला आले हाेते. तर याच मागार्वरुन मंत्रालय गाठणारे प्रशासकीय अधिकारीही काेंडीमध्ये अडकल्याने अनेकांनी महापालिका आणि वाहतूक पाेलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आधी पातलीपाडयाजवळ पुलावर रसायनाचा ट्रक पलटी झाला. हे रसायन धाेकादायक असल्यामुळे हा ट्रक बाजूला करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यात चुकीच्या दिशेने आलेले वाहन चालक आणि ११ नंतर याच मार्गाने सुरु झालेली मालवाहू वाहनांची वाहतूक या सर्वच कारणांमुळे ही वाहतूक काेंडी झाली. ज्याठिकाणी अपघात झाला. त्याठिकाणी मेट्राे अधिकाऱ्यांच्या मदतीने रस्ता तातडीने दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा अशी वाहतूक काेंडी हाेणार नाही.पंकज शिरसाठ, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Accidentअपघात