शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:37 AM

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती

ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आव्हाड यांनी सय्यद यांचा तब्बल ७५ हजार ६३९ मतांनी दणदणीत पराभव केला. ‘आप’चे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार मते मिळाली. त्यामुळे आव्हाडांच्या एक लाख मताधिक्य मिळवण्याच्या स्वप्नाला धक्का बसला.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती. मात्र, ऐन वेळेस एमआयएमने आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना साथ दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून आव्हाड आघाडीवर राहिले. नवव्या फेरीअखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने सय्यद यांनी मतमोजणीकेंद्रातून काढता पाय घेतला. सुरुवातीला ईव्हीएम मशीनबाबत आक्षेप घेण्यात आले होते.

अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. आव्हाड यांनी सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या सय्यद यांचा त्यांनी ७५ हजार ६३९ मतांनी पराभव केला. आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३, तर सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार ५२० मते मिळाली. सय्यद यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याची सेनेची खेळी फसली आहे. आव्हाड यांनी मागील १० वर्षांत केलेल्या विकासकामांना मते देऊन मतदारांनी त्यांना विजयी केले. मागील निवडणुकीतही शिवसेनेने त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आव्हाड यांना मागील निवडणुकीत ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेच्या उमेदवाराला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा आव्हाड यांच्या मतांमध्ये २२ हजार ७५० मतांची वाढ झाली.

विजय मिळणारच होता; परंतु आता जबाबदारी वाढली आहे. आता पुढील पाच वर्षांत कामांवर लक्ष द्यायचे आहे. प्रचारात जे बोललो, तेच काम केले. मतदात्यांचे आभार मानतो. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे. उदयनराजेंचा झालेला पराभव हा माझ्यासाठी अधिक आनंद देणारा आहे. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. साताराकरांचे मनापासून आभार मानतो. आता विचारधारांची लढाई होणार आहे. ३७० च्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका जिंकता येत नाहीत, हे जनतेने दाखवून दिले.- जितेंद्र आव्हाड, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mumbra-kalwa-acमुंब्रा कळवाNCPराष्ट्रवादी काँग्रेस