शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 4:05 PM

Kalyan Rural Vidhan Sabha Election Results 2019: मनसेला केवळ एका मतदारसंघात यश

कल्याण: सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्येमनसेच्याराजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.मनसेनं 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मनसेला तब्बल 13 जागांवर यश मिळालं होतं. विशेष म्हणजे मुंबईत मनसेनं शिवसेनापेक्षा जास्त जिंकल्या होत्या. अनेक मतदारसंघात मनसेनं शिवसेना, भाजपाला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर मनसेची कामगिरी खालावली. 2014 मध्ये मोदी लाटेत मनसे सपाट झाली. त्यावेळी पक्षाचा केवळ एकमेव उमेदवार विजयी झाला. जुन्नरमध्ये शरद सोनावणे निवडून आले. मात्र त्यांनीही नंतर शिवबंधन बांधत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीणMNSमनसेRaju Patilराजू पाटीलShiv Senaशिवसेना