शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:51 IST

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही.

ठाणे : प्रताप सरनाईक यांना ईडीची भीती वाटत असेल, तर ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, तसे त्यांनाही अधिकार आहेत. त्यासाठी क्वारंटाइन होण्याची गरज नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे आवाहन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केले.

भातखळकर म्हणाले की, महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे, हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा ॲड, माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही. वाडा, पालघर येथील भातखरेदी केंद्र बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेबरोबर जाणार का? असा सवाल त्यांना केला असता, भाजप सर्वच निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वच स्तरांवर सरकार ठरले अपयशीबोईसर : शिवसेनेच्या बदलत्या भगव्या रंगाबरोबर जनतेला लुटण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या वेळी ठाकरे सरकारच्या १० घोटाळ्यांचा पाढा त्यांनी वाचून तर दाखवला. तसेच कोरोनाच्या नावाने केलेल्या घोटाळ्याचा उल्लेख करून मुंबईच्या महापौरांसह, मंत्री अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचाही समाचार घेतला. कोरोनास्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :BJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरpratap sarnaikप्रताप सरनाईक