शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 06:19 IST

तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा (कंकणासारखी) दिसते.

ठाणे : येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

सोमण म्हणाले की, सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रबिंब ८५ टक्के सूर्यबिंबाला झाकून टाकणार आहे. हे सूर्यग्रहण १५४ सरॉस ग्रहणचक्रातील या आहे. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. खंडग्रास सूर्यग्रहणावेळी सूर्यबिंबाचा थोडा भाग चंद्रबिंबाद्वारे झाकला जातो, खग्रास सूर्यग्रहण म्हणजे ज्यावेळी चंद्रबिंबामुळे संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते.

तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा (कंकणासारखी) दिसते. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहावयाचे नसते. तसे पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण हे पाहावयाचे असते. ग्रहणचष्यातूनच

आगामी काळात होणारी विविध सूर्यग्रहणे

कंकणाकृती सूर्यग्रहण

१७ फेब्रुवारी २०२६

खग्रास सूर्यग्रहण

१२ ऑगस्ट २०२६

कंकणाकृती सूर्यग्रहण

६ फेब्रुवारी २०२७

खग्रास सूर्यग्रहण

२ ऑगस्ट २०२७

२०२७ मध्ये संधी

भारतातून दिसणारे यापुढील सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. ते जरी खग्रास सूर्यग्रहण असले तरी भारतातून ते खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

कंकणाकृती सूर्यग्रहण

२६ जानेवारी २०२८

खग्रास सूर्यग्रहण

२२ जुलै २०२८

खंडग्रास सूर्यग्रहण

१४ जानेवारी २०२९

खंडग्रास सूर्यग्रहण

१२ जून २०२९

खंडग्रास सूर्यग्रहण

११ जुलै २०२९

खंडग्रास सूर्यग्रहण

५ डिसेंबर २०२९