शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: ...तर बदलापुरातील दुकाने सोमवारपासून होणार सुरू; व्यापाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:57 IST

: नुकसानभरपाई द्या, मग टाळेबंदी करा

बदलापूरः राज्य शासनाने लागू केलेली टाळेबंदी अन्यायकारक असून आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या. अन्यथा आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्यानंतर हवे तितके दिवस टाळेबंदी करावी, अशी मागणी करून गुरुवारी बदलापूर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकान सुरू आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी दिला. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून दुकाने उघडली जातील. त्यानंतर कोणताही गुन्हे दाखल केले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असेही व्यापारी संघटनांनी जाहीर केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्य शासनाने लागू केलेली अंशतः टाळेबंदीवरून व्यापारीवर्गात असंतोष पसरला आहे. त्याचा फटका व्यापारीवर्गाला बसत असून त्याविरुद्ध पहिल्या दिवसापासूनच व्यापारी संघटना, दुकानदार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या नियमात पोलिसांच्या आवाहनावरून व्यापाऱ्यांनी रात्री आठनंतर कोणतीही सूचना नसताना दुकाने बंद करून सहकार्य केले. मात्र, व्यापाऱ्यांना गृहीत धरून राज्य शासनाने पुन्हा अंशतःच्या नावाखाली पूर्णतः टाळेबंदी केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी बदलापुरातील बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व दुकानदार राज्य शासनाच्या निषेधाचे फलक घेऊन आपल्या बंद दुकानाबाहेर उभे होते. यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता टाळेबंदीला विरोध केला. शासनाने टाळेबंदीतील आमच्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला मदत जाहीर करावी, यापुढे प्रतिमाह ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन हवे तेवढे दिवस टाळेबंदी करावी, अशी आमची मागणी असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.

राज्य शासनाने दुकानांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही सोमवारपासून आमची दुकाने  सुरू करणार आहोत. दुकान बंद असल्याने असेही आमचे नुकसान होत असून गुन्हे दाखल केल्यानंतर आणखी किती नुकसान होईल, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे.

अंबरनाथमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन, ‘लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव’चे झळकवले फलक
अंबरनाथ : सोमवारपासून राज्यासह अंबरनाथमध्ये मिनी लॉकडाऊन लागू झाल्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्यापारीवर्गावर लावलेले निर्बंध वेळीच हटवले नाहीत तर नाईलाजाने दुकाने उघडण्याचा इशारा अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेने शासनाला दिला आहे.
मिनी लॉकडाऊनमुळे लावलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ गुरुवारी अंबरनाथ व्यापारी महासंघातर्फे संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम भागात व्यापारी बांधवांनी मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.
मिनी लॉकडाऊनमध्ये शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, नव्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण केली गेली. यावेळी लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव, व्यापाऱ्यांना लॉकडाऊन मंजूर नाही अशा घोषणा देणारे फलक हातात घेतले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या