शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के रिक्षा सीएनजीवर, तरी भाडे पेट्रोलचेच!

By admin | Updated: January 19, 2016 02:07 IST

एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना

कल्याण : एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आरटीओचा भोंगळ कारभार आणि रिक्षा संघटनांच्या भूमिकेच्या वादाचा फटका बसला आहे. या वादात अजून वर्षभर तरी रिक्षांचे भाडे कमी होण्याची चिन्हे नाहीत. पंपांच्या कमतरतेमुळे या परिसरातील रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालण्यास अजून वर्ष लागण्याची चिन्हे आहेत. ७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी त्यांचे नवे दरपत्रक लागू होऊ शकते, असे सांगणारे आरटीओचे अधिकारी तेवढे प्रमाण गाठूनही मूग गिळून गप्प आहेत, तर जोवर १०० टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर म्हणजे अजून वर्षभर नवे दरपत्रक लागू होऊ शकत नाही, अशी संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे तूर्त तरी प्रवाशांना पेट्रोलच्या वाढीव दरपत्रकानुसारच प्रवास करावा लागणार आहे. रुपया-दोन रुपयांची बेकायदा भाडेवाढ होत असूनही अणि शेअर रिक्षांच्या भाड्यात मनमानी दरवाढ होऊनही आरटीओने आजवर कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे पेट्रोलचे दर वाढताच भाडेवाढ होते, पण गेल्या वर्षभरात सातत्याने दर कमी होऊनही भाड्यात कपात झालेली नाही. कल्याण आरटीओ कार्यालयांतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, मुरबाड हा भाग येतो. या परिसरात सध्या जवळपास २२ हजार रिक्षा चालतात. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सक्षम नसल्याने ती सगळीकडे पूर्णपणे पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे रिक्षा प्रवासाला सक्षम पर्याय देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालवाव्या, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केली आहे. आधीपासूनच ते ही मागणी करीत आहेत. एकूण रिक्षांपैकी ७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात. आता अवघ्या २५ टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होणे शिल्लक आहे. हे काम कधी पूर्ण होईल, याबाबतची वेळ-काळ सांगता येणार नाही, असे कल्याण आरटीओ कार्यालयाचे सरकारी उत्तर आहे. रिक्षाचालकांवर सीएनजीची सक्ती करता येत नाही. सीएनजी इंधनाचे पंप कल्याण-डोंबिवलीत कमी प्रमाणात आहेत, असे कारण त्यांनी त्यासाठी दिले आहे. सध्या भिवंडी मार्गावर रांजनोली येथे सीएनजी पंप आहे. दुसरा पंप शीळफाटा मार्गावर आहे. तिसरा पंप अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यावर आहे. कल्याण पश्चिमेला जोकर टॉकीजजवळ एक पंप आहे. रिक्षांची संख्या पाहता आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर परावर्तीत झाल्यावर सीएनजीचे दरपत्रक जाहीर करता येते. सध्या अजून काही रिक्षा शिल्लक आहेत. ते प्रमाण पूर्ण झाले की, लगेचच सीएनजीचे दरपत्रक लागू होईल. पण, ते कधी होईल, हे सांगता येत नाही, असे आरटीओचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवलीत आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. कल्याण शहरात एकच पंप आहे. डोंबिवली पश्चिमेला, मानपाडा रोडवर, कल्याण पूर्वेला आणि कल्याण पश्चिमेतील शहाड पूल परिसरात सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. अद्याप हे पंप उभारण्यात आलेले नाहीत, असा तपशील महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांनी पुरविला. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या सध्या ६० टक्के आहे, असा दावा त्यांनी केला. उर्वरित ४० टक्के रिक्षा सीएनजीवर येणे गरजेचे आहे. १०० टक्के रिक्षा सीएनजीवर येण्यास किमान वर्षाचा कालावधी जाईल. जोवर सर्व रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर त्यांचे वेगळे भाडे दर आरटीओकडून निश्चित केले जात नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सीएनजी रिक्षांच्या प्रमाणाबाबत आरटीओ आणि संघटनांत मतभेद आहेत. सीएनजी रिक्षाचालकांना पंपांवर स्वस्त दरात गॅस मिळतो, तरीही नियमानुसार ते प्रवाशांकडून पेट्रोलचेच भाडे वसूल करतात.