शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: May 20, 2014 00:54 IST

शेतीपंपाने बेसुमार उपसा : दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

मोहोळ : शहरासाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या आष्टे-कोळेगाव बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मोहोळ शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या परिसरात २४ तास चालणार्‍या शेकडो शेतीपंपांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी मोहोळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सतीश काळे यांनी केली आहे. ३५ ते ४० हजार लोकसंख्येच्या मोहोळ शहराला आष्टे-कोळेगाव बंधार्‍यातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. बंधार्‍यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. बंधार्‍यातील पाणी संपल्यानंतर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येते, अशी परिस्थिती गेल्या २५ वर्षांपासून आहे, मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सध्या उन्हाचा पारा शिगेला पोहोचला आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी या बंधार्‍यात एक मे रोजी आडविण्यात आले होते. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन व शेतीपंपाचा उपसा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने चार मीटर इतके पाणी आडविले होते. परंतु २४ तास शेतीचे पंप चालू असल्याने केवळ २० दिवसातच अडीच मीटर पाणी संपले आहे. सध्या दीड मीटर इतके पाणी शिल्लक आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा व जून महिन्याचा विचार करता बंधार्‍यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सीना नदीच्या पात्रातून उजनीची तिसरी पाळी सोडण्यासाठी भीमा-सीना जोडकालव्याच्या लेव्हलला धरणाची पातळी आल्याने नदीद्वारे आता पाणी येणार नाही हे निश्चित असल्याने शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून न ठेवल्यास ऐन जून महिन्यात मोहोळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत व महसूल विभागाला याबाबत लेखी पत्र दिले आहे. मोहोळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही उपसरपंच सतीश काळे यांनी तहसीलदारांनी तातडीने नदी परिसरात वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.