शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ‘नोटा’ चौथ्या क्रमांकावर!

By admin | Updated: May 20, 2014 00:36 IST

माढा : चार हजारांवर मतदारांची उमेदवारांना नापसंती

सोलापूर: सोलापूर आणि माढा मतदारसंघांत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला असून, सोलापूर मतदारसंघात ‘नोटा’ची मते चौथ्या क्रमांकावर आहेत; तर माढ्यात ४ हजारांहून अधिक मतदारांनी हा अधिकार वापरून मतदारसंघातील सर्वच उमेदवारांबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. महागाई आणि भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या जनतेला जसा प्रस्थापितांविरोधात मतदान करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे; तसा मतदारसंघातील कोणताच उमेदवार मान्य नसल्याचे जाणवल्यास ‘नोटा’ अर्थात ‘नन् आॅफ दी अबाऊव्ह’ हा विशेष मताधिकार वापरण्याचा अधिकार यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच दिला आहे. त्यामुळे ‘नोटा’चा वापर नेमका किती होतो, हे जाणून घेण्याची मोठी उत्सुकता होती. मतमोजणीच्यावेळी रामवाडी गोदामात जमलेल्या माध्यमांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि नेत्यांचे ‘नोटा’कडे लक्ष होते. माढा मतदारसंघात पहिल्या फेरीमध्येच १५६ ‘नोटा’ मते नोंदली गेली. मतांचे हे प्रमाण कमी असले तरी मतदार जाणीवपूर्वक या अधिकाराचा वापर करीत असल्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा ऐकायला मिळाली. सोलापूर मतदारसंघातही पहिल्या फेरीपासून माढ्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात ‘नोटा’ची मते नोंदली गेली. माढा मतदारसंघात ‘नोटा’ची मते नवव्या स्थानावर आहेत. तेथे ४२०९ मते नोंदली गेली. मतांचे हे प्रमाण ०.३८ टक्के इतके नगण्य असले तरी ग्रामीण भागातही ‘नोटा’बद्दल जगजागरण झाल्याचे स्पष्ट होते. सोलापूर मतदारसंघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २२७५ इतकी ‘नोटा’ मते पडली. येथे १३७७८ इतक्या ‘नोटा’ मतांची नोंद झाली. अ‍ॅड. शरद बनसोडे (५१७८७९), सुशीलकुमार शिंदे (३६८२०५), बसपाचे अ‍ॅड. संजीव सदाफुले (१९०४१) यांच्यानंतर चौथ्या क्रमांकार ‘नोटा’ मते होती. या मतांचे प्रमाण १.४४ टक्के इतके आहे.

---------------------------------------------------

‘नोटा’चा फायदा

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘नोटा‘ मतांचे प्रमाण कमी असले तरी हा अधिकार मतदारांनी वापरला, ही बाब महत्त्वाची आहे. मतदारांना दिलेला ‘नोटा’चा अधिकार राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यास बाध्य करणारा आहे. या अधिकारामुळे मतदानाचे प्रमाण वाढेल, असा राजकीय अभ्यासकांचा होरा आहे.

------------------------------

मतदानाची पोच पावती बिगर शासकीय संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ‘नोटा’चा कायद्याने दिलेला अधिकार पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रदान करण्यात आला. आता ‘व्होटर्स व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल’ अर्थात मतदान व्यवस्थितपणे नोंदले गेल्याची पोच पावती मतदारांना मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.