शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आयटीआयचे केवळ अकरा विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास

रत्नागिरी : सदोष गुणपद्धतीमुळे आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील केवळ अकरा विद्यार्थी पास झाले आहेत.
रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. परंतु नकारात्मक गुणपध्दतीमुळे बहुतांश ट्रेडचा शून्य टक्के लागला आहे. सेमिस्टर पॅर्टनच्या परीक्षेच्या निकालाची राज्यभर हिच स्थिती असल्याने आयटीआयमधील मुलांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
रत्नागिरी आयटीआय संस्थेने जाहीर केलेला निकाल मुलांकडून परत मागून पुनर्तपासणीसाठी पाठविला आहे. याप्रकरणी आयटीआय सहसंचालकांनी निकाल पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्रिसदसीय समिती नेमली आहे. राज्यातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेमिस्टरची महत्त्वपूर्ण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला. सदोष गुण पद्धतीमुळे निकालावर परिणाम झाला आहे. निकाल कमी लागल्याने विद्यार्थ्यांसह सर्व संस्था हवालदिल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)


राज्यात सेमिस्टरची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत. चुकीच्या गुणपद्धतीने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अजून या सदोष निकालप्रकरणी काय निर्णय घ्यायचा, याची निश्चिती होत नसल्याने हजारो विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रवेश घेऊ शकणार नाहीत.
- ए. आर. साबळे,
उपप्राचार्य, आयटीआय, रत्नागिरी.