शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू पिकांबाबत योग्य निर्णय : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:54 IST

Congress, zp, ncp, fruit, sindhudurgnews यावर्षी पावसाने मोठी हानी झाली. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणे गरजेचे आहे. आंबा व काजू पिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केला.

ठळक मुद्दे आंबा, काजू पिकांबाबत योग्य निर्णय : बाळासाहेब पाटीलसहकार, पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कुडाळात मेळावा

कुडाळ : यावर्षी पावसाने मोठी हानी झाली. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणे गरजेचे आहे. आंबा व काजू पिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केला.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, राज राजापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, सावळाराम अणावकर, रवींद्र चव्हाण, शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, बाळ कनयाळकर, पुंडलिक दळवी, प्रमोद धुरी, पूजा पेडणेकर, चित्रा देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी ह्ययेवा कोकण आपलाच आसाह्ण अशा मालवणी भाषेत भाषणाला सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. आमचे नेते पवार यांचे कोकणावर फार प्रेम आहे. जिल्ह्यातील सहकाराचा, सोसायट्यांचा, पीक कर्जाबाबतीत आढावा घेतला आहे. येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आढावा घेणार आहे. जिल्हा नियोजन समितीत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान वाटा देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला काहीजण सोडून गेले. पण येथील जनता पवारांच्या पाठीशी आहे.

कुडाळकरांचा योग्य सन्मान : पाटील

पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव राहील. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या काका कुडाळकर यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. कोकणात पर्यटकांसाठी दुचाकी परवानगी गोव्याच्या धर्तीवर दिली जाईल, अशी घोषणा सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात केली.


काका कुडाळकर हे माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आमच्या पक्षात प्रवेश करतील असे कधीही वाटले नव्हते. पाटील हे जरी मंत्री असले तरी कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते संपर्कमंत्री म्हणून जिल्ह्याला लाभले हे भाग्य आहे. शिवसेनेलासुद्धा कळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात काय आहे. शिवसेनेने जर विश्वासात घेतले नाही तर आम्हांला पण स्वतंत्र पर्याय आहे. याचा शिवसेनेने विचार करावा.
- अमित सामंत,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी


महाआघाडीची सत्ता आहे. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांचे काम एकतर्फी आहे. ते कोणत्याही उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. आमचे नेते अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. तसेच इतर आमच्या नेत्यांचाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी मोलाचा वाट आहे. सत्तेतील वाटेकरी असताना पालकमंत्री दुजाभाव का करतात. हे त्यांचे वागणे आघाडीसाठी योग्य नाही.
- बाळ कनयाळकर,
नेते, राष्ट्रवादी
 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkudal-acकुडाळBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलsindhudurgसिंधुदुर्ग