शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळच बनला रेठऱ्याचा ‘ब्रँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच ...

काही गावे ऐतिहासिक स्थळे व वारसा त्याचबरोबर नावीन्यपूर्ण लौकिकामुळे सर्वदूर ओळखली जातात. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रूक गावालाही पाच दशकांपासून ‘रेठरा बासमती’ तांदळाची नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख देशभर पोहोचली असून, परदेशातही हा तांदूळ ‘ब्रँड’ ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीकाठी रेठरे बुद्रूक गाव वसले आहे. याठिकाणी १९६१ मध्ये कृष्णा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना विभागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला. कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल वाढला. मात्र, १९७०च्या दशकात याच साखरपट्ट्यात ऊस सोडून ‘बासमती’ भात पीक लावण्याचा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वीही झाला. त्याकाळी कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांनी हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथून बासमती तांदळाचे ३७० वाणाचे बियाणे आणले. ते बियाणे त्यांनी त्यांच्या शेतात पेरले. त्यानंतर बासमती तांदूळ रेठऱ्याच्या मातीत रुजला. आणि या पिकाच्या सुवासाने परिसर भरून गेला.

आबासाहेब मोहिते यांच्या शेतातील बासमती तांदळाचे पीक पाहण्यास त्यावेळी आसपासचे शेतकरी येऊ लागले. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातही या वाणाची बीजे पसरली. सध्या दर्जेदार व सुवासिक बासमती तांदूळ येथील शिवारात मातीतील विशिष्ट गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकत असून, हा तांदूळ शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा बनला आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना हुकमी उत्पन्नही मिळू लागले असून, गावच्या तिन्ही बाजूला असणारे कृष्णेचे पाणी या पिकासाठी पोषक ठरत आहे.

- संजय पाटील

- चौकट

... म्हणून पिकतो तांदूळ !

खरंतर तांदूळ हे समुद्र किनारपट्टीच्या भागातील पीक मानले जाते. महाराष्ट्रात कोकण भागात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते रेठरे गावच्या तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्यातील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी उपयुक्त आर्द्रता शिवारात सर्वत्र निर्माण होते. याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो.

- चौकट

घरोघरी सुगंध

रेठरे बुद्रूक गावातील अपवाद वगळता सर्वच शेतकरी बासमती तांदळाचे उत्पादन घेतात. सुगीच्या कालावधीत गावामध्ये प्रवेश केला की घराघरातून या तांदळाचा सुवास नक्की अनुभवता येतो.

- चौकट

दुकानाबाहेर पाट्या; दुबईतही सुगंध

सातारा, सांगली, कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेतही ‘रेठरा बासमती’ तांदळाला विशेष मागणी आहे. काही ठिकाणी तर दुकानाबाहेर ‘रेठरा तांदूळ मिळेल’ असे फलकच लावलेले दिसतात. दुबईपर्यंत या तांदळाचा सुगंध पोहोचला असून, तेथेही या तांदळाला चांगली मागणी आहे.

फोटो : १०संडे०१, ०२, ०३

कॅप्शन : प्रतीकात्मक